शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:19 IST

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत्यल्प प्रमाणात हा विसर्ग आहे.

ठळक मुद्दे१४६ टीएमसीवर पाणी : जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा यंदा भरण्यास उशीर; तीन धरणांमधून विसर्ग सुरू

सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत्यल्प प्रमाणात हा विसर्ग आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तर गेल्यावर्षी सततच्या व धुवांधार पावसामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील प्रमुख धरणे फुल्ल झाली होती. त्यानंतरही पाऊस होत राहिल्याने पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी झाली नाही.

परिणामी यावर्षी उन्हाळ्यातही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा टिकून राहिला होता. त्यातच यावर्षी जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरूवात झाली.

काही दिवस धुवांधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला.

परिणामी धरणे भरणार का? अशी चिंताही निर्माण झाली होती. आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरूवात झाली. पश्चिम भागात तर काही दिवस धुवांधार पाऊस पडला.

यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता.जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्य:स्थितीत या धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

म्हणजे धरणे भरण्यासाठी फक्त २ टीएमसी पाण्याची आवश्यता आहे. त्यातच या धरण परिसरातही सध्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची हळू हळू आवक होत असून धरणे भरल्यातच जमा आहेत.दरम्यान, सद्य:स्थितीत धोम धरणातून बोगद्याद्वारे १५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कण्हेरच्या पॉवर हाऊसमधून नदीला ५७४ तर उरमोडी धरणातून नदीला २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणातही १.१५ टीएमसी पाणीसाठा झाला असून १०० टक्के भरले आहे. सध्या या धरणातून १५६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे              यावर्षी       टक्केवारी    एकूण क्षमता

  • धोम           १३.२८            ९८.३८         १३.५०
  • कण्हेर         ९.९२             ९८.१७         १०.१०
  • कोयना     १०३.९६            ९८.७७       १०५.२५
  • बलकवडी    ३.९०               ९५.५९          ४.०८
  • उरमोडी       ९.८५                ९८.८८         ९.९६
  • तारळी         ५.८३               ९९.६४          ५.८५
टॅग्स :RainपाऊसDamधरणSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण