शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:19 IST

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत्यल्प प्रमाणात हा विसर्ग आहे.

ठळक मुद्दे१४६ टीएमसीवर पाणी : जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा यंदा भरण्यास उशीर; तीन धरणांमधून विसर्ग सुरू

सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत्यल्प प्रमाणात हा विसर्ग आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पाच महिने पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तर गेल्यावर्षी सततच्या व धुवांधार पावसामुळे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील प्रमुख धरणे फुल्ल झाली होती. त्यानंतरही पाऊस होत राहिल्याने पिकांसाठी पाण्याची मोठी मागणी झाली नाही.

परिणामी यावर्षी उन्हाळ्यातही धरणांमध्ये चांगला पाणीसाठा टिकून राहिला होता. त्यातच यावर्षी जून महिन्यात मान्सूनच्या पावसालाही वेळेवर सुरूवात झाली.

काही दिवस धुवांधार पाऊस पडला. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पण, त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. जुलै महिन्यात तर कमी प्रमाणात पाऊस झाला.

परिणामी धरणे भरणार का? अशी चिंताही निर्माण झाली होती. आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून चांगला पाऊस होण्यास सुरूवात झाली. पश्चिम भागात तर काही दिवस धुवांधार पाऊस पडला.

यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणांत वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता.जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्य:स्थितीत या धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

म्हणजे धरणे भरण्यासाठी फक्त २ टीएमसी पाण्याची आवश्यता आहे. त्यातच या धरण परिसरातही सध्या अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे पाण्याची हळू हळू आवक होत असून धरणे भरल्यातच जमा आहेत.दरम्यान, सद्य:स्थितीत धोम धरणातून बोगद्याद्वारे १५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कण्हेरच्या पॉवर हाऊसमधून नदीला ५७४ तर उरमोडी धरणातून नदीला २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणातही १.१५ टीएमसी पाणीसाठा झाला असून १०० टक्के भरले आहे. सध्या या धरणातून १५६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे              यावर्षी       टक्केवारी    एकूण क्षमता

  • धोम           १३.२८            ९८.३८         १३.५०
  • कण्हेर         ९.९२             ९८.१७         १०.१०
  • कोयना     १०३.९६            ९८.७७       १०५.२५
  • बलकवडी    ३.९०               ९५.५९          ४.०८
  • उरमोडी       ९.८५                ९८.८८         ९.९६
  • तारळी         ५.८३               ९९.६४          ५.८५
टॅग्स :RainपाऊसDamधरणSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण