शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

जिल्ह्यात ज्वारीची ९१ तर गहू, हरभरा पेर ७७ टक्के..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:08 IST

Agriculture Sector, Farmar, Sataranews सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ८५ टक्के क्षेत्रावर पीक घेण्यात आले आहे. तर ज्वारीची ९१, गहू आणि हरभऱ्याची पेरणी ७७ टक्क्यांवर झाली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ८७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असून पिकेही चांगल्या स्थितीत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ज्वारीची ९१ तर गहू, हरभरा पेर ७७ टक्के.. रब्बी हंगाम : पाणीसाठा पुरेसा; पिकेही चांगल्या स्थितीत

सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ८५ टक्के क्षेत्रावर पीक घेण्यात आले आहे. तर ज्वारीची ९१, गहू आणि हरभऱ्याची पेरणी ७७ टक्क्यांवर झाली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ८७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असून पिकेही चांगल्या स्थितीत आहेत.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पीकही अत्यल्प क्षेत्रात घेण्यात येते.मागील दोन महिन्यांपासून रब्बी हंगामातील पेरणीस सुरुवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. तर काही ठिकाणी आगाप पेरणी केलेल्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. असे असलेतरी सद्य:स्थितीत जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक १ लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९०.७७ आहे.जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यांतही ज्वारीचे क्षेत्र आहे. 

आतापर्यंत गव्हाची जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर मकेची ४ हजार ४६७ आणि हरभऱ्याची २३ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची सर्वाधिक पेरणी कऱ्हाड तालुक्यात ४ हजार ५०५ आणि त्यानंतर फलटणमध्ये ४ हजार २३७ हेक्टरवर झालेली आहे. मका पीकही अनेक तालुक्यांत घेण्यात आलेले आहे.माणमध्ये ९९, वाई अन् कोरेगावला ९० टक्क्यांवर पेरणी पूर्णत्वास...जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कऱ्हाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पेरणी माण तालुक्यात ९९.२२ टक्के झाली आहे. तर पेरणी क्षेत्र ३९ हजार ५०६ हेक्टर झाले आहे. त्यानंतर खटावमध्ये ८९.६५ टक्के झाली आहे. तर फलटण ७२.१९, सातारा तालुका ७६.६३, वाई ९१.६५, कऱ्हाड तालुक्यात ७७.३१, पाटण ८२, जावळी तालुका ७९ आणि कोरेगावमध्ये ९०.८३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्णत्वास गेलेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी