शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ज्वारीची ९१ तर गहू, हरभरा पेर ७७ टक्के..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:08 IST

Agriculture Sector, Farmar, Sataranews सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ८५ टक्के क्षेत्रावर पीक घेण्यात आले आहे. तर ज्वारीची ९१, गहू आणि हरभऱ्याची पेरणी ७७ टक्क्यांवर झाली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ८७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असून पिकेही चांगल्या स्थितीत आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ज्वारीची ९१ तर गहू, हरभरा पेर ७७ टक्के.. रब्बी हंगाम : पाणीसाठा पुरेसा; पिकेही चांगल्या स्थितीत

सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ८५ टक्के क्षेत्रावर पीक घेण्यात आले आहे. तर ज्वारीची ९१, गहू आणि हरभऱ्याची पेरणी ७७ टक्क्यांवर झाली आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ८७ हजार हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे पाणी उपलब्ध असून पिकेही चांगल्या स्थितीत आहेत.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पीकही अत्यल्प क्षेत्रात घेण्यात येते.मागील दोन महिन्यांपासून रब्बी हंगामातील पेरणीस सुरुवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. तर काही ठिकाणी आगाप पेरणी केलेल्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. असे असलेतरी सद्य:स्थितीत जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक १ लाख २६ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९०.७७ आहे.जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यांतही ज्वारीचे क्षेत्र आहे. 

आतापर्यंत गव्हाची जवळपास २७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर मकेची ४ हजार ४६७ आणि हरभऱ्याची २३ हजार ७१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची सर्वाधिक पेरणी कऱ्हाड तालुक्यात ४ हजार ५०५ आणि त्यानंतर फलटणमध्ये ४ हजार २३७ हेक्टरवर झालेली आहे. मका पीकही अनेक तालुक्यांत घेण्यात आलेले आहे.माणमध्ये ९९, वाई अन् कोरेगावला ९० टक्क्यांवर पेरणी पूर्णत्वास...जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कऱ्हाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पेरणी माण तालुक्यात ९९.२२ टक्के झाली आहे. तर पेरणी क्षेत्र ३९ हजार ५०६ हेक्टर झाले आहे. त्यानंतर खटावमध्ये ८९.६५ टक्के झाली आहे. तर फलटण ७२.१९, सातारा तालुका ७६.६३, वाई ९१.६५, कऱ्हाड तालुक्यात ७७.३१, पाटण ८२, जावळी तालुका ७९ आणि कोरेगावमध्ये ९०.८३ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्णत्वास गेलेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी