शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात दररोज ८ ते १० सायबर क्राईम : तक्रारींची संख्या तीनशेपटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:08 IST

सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी

ठळक मुद्देआर्थिक फसवणुकीसह विनयभंग, जातीय तणावाच्या घटना वाढतायत

स्वप्नील शिंदे ।सातारा :  जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी आल्या होत्या. २०१८ मध्ये या तक्रारींची संख्या दरमहा दोनशेवर पोहोचली आहे. मात्र, स्मार्टफोनच्या माध्यमातून त्रास देणारी बहुतांश मंडळी ओळखीतीलच किंवा नातेवाईकच असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण मात्र कमी आहे.

आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. सातारा जिल्ह्यात दररोज तब्बल ८-१० सायबर क्राईम होत असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात सायबर गुन्ह्यात सर्वाधिक प्रमाण डेबिट, क्रेडिट आणि एटीएमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचे आहे. त्याची आकडेवारी जवळपास ७५ टक्क्यांच्या घरात आहेत. सायबर क्राईम विभागाकडे १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत असे गुन्हे घडल्याचे तब्बल २४० अर्ज आले असून, त्यातील सर्वाधिक तक्रारी डेबिट, क्रेडिट आणि एटीएमकार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या आहेत. ‘तुमच्या एटीएमकार्डची वैधता संपली असून, नवीन कार्डसाठी सीव्हीव्ही नंबर आणि त्यानंतर आलेला ओटीपी सेंड करा,’ असे फोन विविध प्रकारचे कार्ड वापरणाºयांना येतात.

फोनवर सांगितल्याप्रमाणे वापरकर्त्याने सीव्हीव्ही आणि ओटीपी सांगितला, की त्यांच्या खात्यातून काही रक्कम कमी झाल्याचे प्रकार सध्या सर्रास घडत आहेत. तसेच व्हॉटसअ‍ॅपवर आलेले मॅसेस फॉरवर्ड करणे, या घटनामुळे अनेकांच्या धार्मिक व सांप्रदायिक भावना दुखावल्याच्या घडना घडल्या आहेत. मित्रमंडळी आणि नातेवाइकांसोबत काढलेल्या फोटो मॉर्फिंगच्या घटना जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातही घडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.फसवणुकीसाठी  सातारा पोलिसांचा वेगळा ग्रुपसातारा पोलिसांच्या वतीने सायबर सेलने सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक व अंमलदारांचा स्टॉप एटीएम फ्रॉड हा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप काढला आहे. कोणत्याही पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार आल्यानंतर तक्रारदाराची प्राथमिक माहिती त्या ग्रुपवर टाकली जाते. जेवढ्या लवकर सायबर सेलला ही माहिती मिळते तेवढी जास्त रक्कम तक्रारदारास मिळत असते. त्यामुळे अनेकांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत झाली आहे.सोशल मीडियामुळे शहरासह ग्रामीण भागात गुन्हे सोशल मीडिया म्हणजे आजच्या तरुणाईचा जीव की प्राण झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून बदनामी, अश्लील फोटोटाकणे आणि कमेंट केल्याप्रकरणी शहरी भागासह अगदीग्रामीण भागातही शेकडो गुन्हे घडले आहेत. सायबरक्राईम हे केवळ आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादितनसून फेक अकाऊंट काढून बदनामी, हॅकिंग आणिडाटाचोरी असे गुन्हेही केले जात आहेत. 

अनोळखी व्यक्तीचे मेसेज किंवा फेक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तसेच लॉटरी लागल्याचे सांगणाºया कॉलला प्रतिसाद देऊ नका, तसेच सोशल माध्यमांवर व्हायरल होणारे सर्वच फोटो किंवा व्हिडीओ खरे असतील, असे नाही. त्यामुळे खात्री करूनच ते शेअर करा.- गजानन कदम,सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Crimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणेSatara areaसातारा परिसर