शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

बसचालकाच्या सतर्कतेने बचावले ५० जणांचे प्राण, बसचा ब्रेक फेल, सर्व मुंबईचे रहिवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:05 IST

अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील सुमारे ५० जण आले होते. हा किल्ला पाहून उतरत असताना खासगी बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, चालकाने सतर्कतेने गाडी पहिल्या गिअरमध्ये घेत दोन-तीन ठिकाणी धडकवण्याचा प्रयत्न केला.

सातारा : अजिंक्यतारा किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील सुमारे ५० जण आले होते. हा किल्ला पाहून उतरत असताना खासगी बसचा ब्रेक फेल झाला. मात्र, चालकाने सतर्कतेने गाडी पहिल्या गिअरमध्ये घेत दोन-तीन ठिकाणी धडकवण्याचा प्रयत्न केला. ब-याच प्रयत्नांती गाडी थांबविण्यात यश आले. या अपघातात सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाशी (मुंबई) येथील सुमारे ५० जण सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी आले आहेत. सोमवारी त्यांनी सज्जनगड येथे जाऊन श्री रामदास स्वामी समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण साता-यात आले. दुपारच्या सुमारास ते अजिंक्यतारा किल्यावर गेले होते. ते पाहून झाल्यानंतर पुन्हा ते खासगी बसमध्ये बसून साता-यात येत होते. त्यावेळी ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने पहिल्या गिअरमध्ये गाडी घेत दोन-तीन ठिकाणी धडकवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश येत नव्हते. विजेच्या खांबावरही गाडी घातली. त्यानंतर कसेबसे गाडीवर नियंत्रण मिळवत बाजूला गाडी थांबवली. या अपघातात सात ते आठ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे.  दरम्यान, अजिंक्यतारा किल्यावर अपघात झाल्याची माहिती मिळताच सातारकरांनी तिकडे धाव घेतली. अनेकांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात