शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ४५ टीएमसी साठा, सिंचनासाठी विसर्ग सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:53 IST

मान्सूनच्या पावसाकडे लक्ष

सातारा : मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल होण्याचा अंदाज असतानाच सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ही अजून चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे. कोयनेसह सहा धरणात सुमारे ४५ टीएमसी पाणी आहे. तर कण्हेर आणि उरमोडीत चांगला साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वेळेत पाऊस सुरू झाल्यास धरणांत साठा वेगाने वाढू शकतो.जिल्ह्याच्या पश्चिम भागातच मोठी आणि प्रमुख धरणे आहेत. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच अनेक गावांची तहान ही भागत आहे. दरवर्षी चांगला पाऊस झाल्यास धरणे भरतात. त्यामुळे वर्षभर चिंता नसते.मागील वर्षीही जिल्ह्यात सरासरीच्या १२५ टक्के पर्जन्यमान झालेले. त्यामुळे पश्चिम भागातील सर्वच धरणे भरुन वाहू लागली होती. परिणामी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. त्यातच अजून ही या धरणांत चांगला पाणीसाठा आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी साठ्याचे वर्ष गृहीत धरले जाते. त्यामुळे एक जूनपासून नवीन वर्ष सुरू होत आहे.

जिल्ह्यातील कोयना हे सर्वात मोठे धरण. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन योजना अवलंबून आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ही पाणी वापरले जाते. सध्या कोयना धरणात २९.५८ टीएमसी साठा उपलब्ध आहे. धरणात चांगला साठा असला तरी सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी ३ हजार ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.त्याचबरोबर धोमसह कण्हेर, तारळी, उरमोडी या धरणात ही चांगला साठा आहे. खटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे. या धरणावर अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. या धरणात फक्त ३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. मान्सूनचा पाऊस वेळेत सुरू झाला तरच टंचाई जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.

धरणांमधून ६ हजार क्युसेक विसर्ग..जिल्ह्यातील प्रमुख ६ धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरूच आहे. कोयनातून ३ हजार ५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर धोममधून ९१० क्युसेक, बलवकडीतून ३३४, कण्हेरमधून नदी आणि कालव्याद्वारे ४२० क्युसेक विसर्ग केला जातोय. उरमोडीतून ५४५ आणि तारळी धरणातून ४८३ क्युसेक विसर्ग सुरू आहे. उन्हाळी पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याने विसर्ग होत आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठाधरण - सध्या साठा - टक्केवारी - एकूण क्षमताकोयना - २९.५८ - २४.४३ - १०५.२५धोम - ४.८४ - २५.९१ - १३.५०बलकवडी - १.०० - २२.३३ - ४.०८कण्हेर - ३.९४ - ३५.७६ - १०.१०उरमोडी - ३.९० - ३७.२९ - ९.९६तारळी - १.३६ - २३.०९ - ५.८५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणी