शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४०० कोटींचे नुकसान, पंचनामे सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 14:55 IST

Flood Satara : सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.

ठळक मुद्दे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४०० कोटींचे नुकसान, पंचनामे सुरुचनुकसान नसलेल्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना धाडले बोलावणे

सागर गुजरसातारा : जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.जिल्ह्यामध्ये दि. २२ ते २४ जुलैया कालावधीमध्ये जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. लोकांना काही समजायच्या आतच त्यांना मृत्यूने गिळंकृत केले. जिल्ह्यातील ४१६ गावांना अतिवृष्टीने आपल्या कवेत घेतले.नद्या, ओढ्यांचे पाणी उभ्या पिकात शिरले, डोंगरावरील दगडमाती शेतात येऊन साठले. शेतांना ताली पडल्या, या पावसामुळे तब्बल ४६ जणांना मृत्यूमुखी पडावे लागले. ३ हजार ४१ पशुधनही शेतकऱ्यांनी गमावले.

प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न करुन बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफच्या दलाने या कामात मोठी मदत होत आहे. जिल्ह्यामध्ये अजूनही एनडीआरएफच्या दोन टीमच्या माध्यमातून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरु आहे.दुसऱ्या बाजूला महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागाच्या पथकाकडून एकत्रितपणे नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. जागोजागी रस्ते खचल्याने या पथकांना बाधित गावांमध्ये पोहोचण्यात अडचणी येत असून प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ते तयार करुन घेतले आहेत, चिखल तुडवतच ही पथके पंचनामे करत आहेत.

अनेक गावांमध्ये जाण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. ज्या तालुक्यांमध्ये कमी नुकसान झाले आहे, त्या भागातील कर्मचारी नुकसानीसाठी वापरावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.अतिवृष्टीमध्ये खासगी मालमत्तांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांची दैना झालेली आहे. हे रस्ते नव्याने बांधावे लागणार आहे.

घाट रस्त्यांमध्ये तर ठिकठिकाणी रस्ताच राहिलेला नाही. अनेक ठिकाणी शाळा इमारतींचे नुकसान झालेले आहे. हे नुकसान कोट्यवधींमध्ये असल्याने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.वीज वितरण कंपनीने वेगाने कामे हाती घेतली. ज्या गावांमध्ये वीज गायब झाली होती, त्या गावांत जीवावर उदार होऊन कर्मचारी काम करत आहेत. अनेक गावे अंधारात होती, आता त्या गावांत प्रकाश आणण्यात वीज वितरणला यश आले आहे.तालुकानिहाय बाधित गावे

  • वाई ४४, कऱ्हाड ३०, पाटण ७०, महाबळेश्वर ११३, सातारा १३, जावली १४६, सातारा ४१६ 

बेपत्ता व्यक्तींचा शोध लागेना...दरडीच्या खाली दबलेले मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अनेक जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचा शोध लागत नसल्याचे चित्र आहे. त्यांना मृत घोषित करता येत नसल्याने अजूनही प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.मृत्यूमुखी पशुधनात वाढजिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरुच आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित गावांमध्ये मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे, नदी, ओढ्यांचे पाणी कमी झाल्याने वाहून गेलेले पशुधनही आता आढळून येऊ लागले आहे. गुरुवारपर्यंत ३ हजार ४१ मयत पशुधन आढळले होते. आता त्यात वाढ होऊन ४ हजार ४१८ पशुधन मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. 

टॅग्स :floodपूरwildlifeवन्यजीवSatara areaसातारा परिसर