शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४०० कोटींचे नुकसान, पंचनामे सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 14:55 IST

Flood Satara : सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.

ठळक मुद्दे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४०० कोटींचे नुकसान, पंचनामे सुरुचनुकसान नसलेल्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना धाडले बोलावणे

सागर गुजरसातारा : जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.जिल्ह्यामध्ये दि. २२ ते २४ जुलैया कालावधीमध्ये जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे नद्या, ओढ्यांना पूर आला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. लोकांना काही समजायच्या आतच त्यांना मृत्यूने गिळंकृत केले. जिल्ह्यातील ४१६ गावांना अतिवृष्टीने आपल्या कवेत घेतले.नद्या, ओढ्यांचे पाणी उभ्या पिकात शिरले, डोंगरावरील दगडमाती शेतात येऊन साठले. शेतांना ताली पडल्या, या पावसामुळे तब्बल ४६ जणांना मृत्यूमुखी पडावे लागले. ३ हजार ४१ पशुधनही शेतकऱ्यांनी गमावले.

प्रशासनाने युध्दपातळीवर प्रयत्न करुन बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफच्या दलाने या कामात मोठी मदत होत आहे. जिल्ह्यामध्ये अजूनही एनडीआरएफच्या दोन टीमच्या माध्यमातून बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरु आहे.दुसऱ्या बाजूला महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागाच्या पथकाकडून एकत्रितपणे नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. जागोजागी रस्ते खचल्याने या पथकांना बाधित गावांमध्ये पोहोचण्यात अडचणी येत असून प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने रस्ते तयार करुन घेतले आहेत, चिखल तुडवतच ही पथके पंचनामे करत आहेत.

अनेक गावांमध्ये जाण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. ज्या तालुक्यांमध्ये कमी नुकसान झाले आहे, त्या भागातील कर्मचारी नुकसानीसाठी वापरावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.अतिवृष्टीमध्ये खासगी मालमत्तांसह सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांची दैना झालेली आहे. हे रस्ते नव्याने बांधावे लागणार आहे.

घाट रस्त्यांमध्ये तर ठिकठिकाणी रस्ताच राहिलेला नाही. अनेक ठिकाणी शाळा इमारतींचे नुकसान झालेले आहे. हे नुकसान कोट्यवधींमध्ये असल्याने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.वीज वितरण कंपनीने वेगाने कामे हाती घेतली. ज्या गावांमध्ये वीज गायब झाली होती, त्या गावांत जीवावर उदार होऊन कर्मचारी काम करत आहेत. अनेक गावे अंधारात होती, आता त्या गावांत प्रकाश आणण्यात वीज वितरणला यश आले आहे.तालुकानिहाय बाधित गावे

  • वाई ४४, कऱ्हाड ३०, पाटण ७०, महाबळेश्वर ११३, सातारा १३, जावली १४६, सातारा ४१६ 

बेपत्ता व्यक्तींचा शोध लागेना...दरडीच्या खाली दबलेले मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अनेक जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचा शोध लागत नसल्याचे चित्र आहे. त्यांना मृत घोषित करता येत नसल्याने अजूनही प्रशासन त्यांचा शोध घेत आहे.मृत्यूमुखी पशुधनात वाढजिल्हा प्रशासनाच्यावतीने अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरुच आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित गावांमध्ये मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे, नदी, ओढ्यांचे पाणी कमी झाल्याने वाहून गेलेले पशुधनही आता आढळून येऊ लागले आहे. गुरुवारपर्यंत ३ हजार ४१ मयत पशुधन आढळले होते. आता त्यात वाढ होऊन ४ हजार ४१८ पशुधन मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. 

टॅग्स :floodपूरwildlifeवन्यजीवSatara areaसातारा परिसर