शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंत परिसरातून २५ पोती कचरा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:00 AM

सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस परिसराची स्वच्छता करुन तब्बल २५ पोती कचरा जमा केला.

ठळक मुद्दे चार भिंती परिसरात दारूच्या बाटल्यांचाही खच ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाचा साताऱ्यात उपक्रम

सातारा : सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाच्या वतीने तीन दिवस परिसराची स्वच्छता करुन तब्बल २५ पोती कचरा जमा केला.ऐतिहासीक स्थळांची झालेली दयनिय अवस्था पाहावत नाही. तसेच त्याची निगा राखण्यासाठी पालिकेकडूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व संवर्धन मित्रमंडळाने चार भिंत स्वच्छतेचा उपक्रम राबविला.मोहिमेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात ते दहा या वेळेत पायथा, पार्किंगसह मुख्य प्रवेश कमानीपर्यंत स्वच्छता करण्यात आली. त्यात सुमारे चार पोती कचरा जमा केला. दुसऱ्या दिवशी मुख्य कमान ते भिंतीच्या मध्यापर्यंत स्वच्छता करण्यात आली.

सुमारे साडेतीन तास चाललेल्या मोहीमेत आठ पोती कचरा व दारूच्या बाटल्या जमा केल्या. तिसऱ्या दिवशी मध्यवर्ती भिंत ते मुख्य स्मारक संपूर्ण भागाची स्वच्छता केली. या मोहीमेत २५ पोती कचरा व दोन पोती दारूच्या बाटल्या जमा केल्या. दारू पिऊन फोडलेल्या बाटल्यांचा हिशोबच नव्हता....आता चारभिंती संवर्धनावर लक्षसलग तीन दिवसांच्या अथक परिश्रमाने चारभिंती चकाचक करण्यात मित्रमंडळाला यश आले आहे. आता संवर्धन करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. संवर्धनासाठी लवकरच शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती मित्रमंडळाचे सर्वेसर्वा शुभम मांडवेकर यांनी दिली.मोहीमेत सहभागी सदस्यया मोहीमेत शुभम मांडवेकर, उत्कर्ष शिंदे, रोहन शेलार, प्रज्योत वडेट्टीवार, शुभम आवळे, अमेय कुलकर्णी, ओमकार कदम, सुरज देशमुख, निलेश शिंगाडे, अक्षय ताटे, अभिजीत मुरकुटे, अक्षय शेलार, ओमकार शिंदे, ऋषीकेश गायकवाड, रोहित ताटपुजे, विशाल मोहिते, अनिकेत कर्णे, साहिल पटेल, शुभम निकम यांनी सहभाग घेतला.कचरा पेटींची नासधूस, मित्रमंडळातर्फे पुन्हा डागडुजी 

चारभिंतीवर येणारे नागरिक खाद्यपदार्थ घेऊन येतात. तेथे भेळ किंवा अन्य पदार्थ खाऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाचे गोळे टाकण्यासाठी पालिकेने कचराकुंडी ठेवलेली नाही. त्यामुळे मित्रमंडळातर्फे खोकी ठेवून कचरापेट्यांची व्यवस्था केली. पण काही विघ्नसंतोषी लोकांनी त्यांची नासधूस केल्याचे दिसून आले. मित्रमंडळातर्फे त्यांची पुन्हा डागडुजी करण्यात आली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर