शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

बालसंगोपनासाठी २५ अर्ज - सातारा जिल्हा परिषद : बातमी मागची बातमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 11:18 PM

कामावर ताण पडेल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे कारण पुढे करून शिक्षकांना बालसंगोपन रजा मंजूर न करण्याची सूचना जिल्हा परिषदेने केली होती. मात्र, जिल्ह्यातील अवघ्या २५ शिक्षकांनीच बालसंगोपन रजा घेण्यासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देफतव्यामागच्या उद्देशावर शिक्षकांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

प्रगती जाधव-पाटील।सातारा : कामावर ताण पडेल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे कारण पुढे करून शिक्षकांना बालसंगोपन रजा मंजूर न करण्याची सूचना जिल्हा परिषदेने केली होती. मात्र, जिल्ह्यातील अवघ्या २५ शिक्षकांनीच बालसंगोपन रजा घेण्यासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील एकूण शिक्षकांच्या संख्येच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे. त्यामुळे रजा मंजूर न करण्याच्या उद्देशाविषयीच शिक्षकांतून शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.

जिल्ह्यात शिक्षण विभागात अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर काम करावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांनी बालसंगोपन रजेसाठी अर्ज केले असल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले होते. या अर्जांची संख्या मोठी असल्यामुळे याचा कामकाजावर परिणाम होऊ लागल्याचेही जिल्हा परिषदेचे म्हणणे होते. शिक्षण विभागामधील कामांबरोबरच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही प्रलंबित राहत असल्यामुळे त्याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्या. त्यातच शिष्यवृत्ती यासह दहावी आणि वार्षिक परीक्षाही जवळ आल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्याचे निदर्शनास आल्याचेही संबंधितांनी सांगितले. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने बालसंगोपन रजा न देण्याची सूचना केली होती. तसा लेखी आदेशही जावळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

याबाबत प्रशासनाने दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की, ‘शासन निर्णयानुसार बºयाच कर्मचाºयांनी बालसंगोपन रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केले आहेत. जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांची संख्या तसेच केलेले अर्ज मंजूर केल्यास प्रशासकीय कामकाजांवर मोठ्या प्रमाणात परिणामहोईल. त्यामुळे बालसंगोपन रजा मंजुरीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोणत्याही कार्यालय प्रमुखअथवा विभाग प्रमुखांनी अशा प्रकारे रजा मंजूर करू नयेत, याबाबतपुढील काही दिवसांत सूचना देण्यात येतील.’नामंजूर रजेमुळे नवलेवाडीच्या शिक्षिका कामावरजिल्हा परिषदेच्या बालसंगोपन रजा नामंजूर करण्याच्या सूचनेमुळे कोरेगाव तालुक्यातील नवलेवाडीच्या शिक्षिकेला कामावर पुन्हा हजर व्हावे लागले आहे. शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शाळेवर दोन शिक्षकांची नेमणूक होती. त्यातील मुख्याध्यापक निवृत्त झाल्यामुळे बालसंगोपनाच्या रजेवर असलेल्या शिक्षिकेला पत्राद्वारे कामावर पुन्हा बोलावण्यात आले. त्यानुसार संबंधित शिक्षिका दि. ५ फेब्रुवारी रोजी हजर झाल्या.गुरुवारी बैठकीचे आयोजनजिल्हा परिषद अंतर्गत असणाºया रिक्त पदांची संख्या पाहून तसेच येऊ घातलेली निवडणूक आणि अन्य शासकीय कामांचा ताण लक्षात घेता या सर्व गोष्टींचा साधक-बाधक विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी या शासना निर्णयात नमूद करण्यात आलेल्या बाबींच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गुरुवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी सर्व विभाग प्रमुख यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.गुरुवारी बैठकीचे आयोजनजिल्हा परिषद अंतर्गत असणाºया रिक्त पदांची संख्या पाहून तसेच येऊ घातलेली निवडणूक आणि अन्य शासकीय कामांचा ताण लक्षात घेता या सर्व गोष्टींचा साधक-बाधक विचार करण्यात येणार आहे. त्यासाठी या शासना निर्णयात नमूद करण्यात आलेल्या बाबींच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गुरुवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी सर्व विभाग प्रमुख यांच्याशी बोलून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषद