शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात १८ हजार शेतकऱ्यांनी उतरविला बोगस विमा

By नितीन काळेल | Updated: November 29, 2024 13:24 IST

फळबागांमध्येही फोलपणा : प्रस्ताव रद्द; ‘कृषी’मुळे शासनाचे साडेपाच कोटी वाचले

नितीन काळेलसातारा : शासनाच्यावतीने पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांनी विमा उतरविला. मात्र, पीक नसलेल्या क्षेत्राचा हा बोगस विमा उतरविण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले आहे. विमा उतरविलेल्या क्षेत्रात कांद्याचे तब्बल ९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. तर फळबागांमध्येही बोगसपणा आढळला आहे.पीक विम्यामध्ये शेतकऱ्यांना एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. उर्वरित हप्त्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येते. पण, यावर्षीच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात कांदा पिकाचा बोगस विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, प्रत्यक्ष पेरणी अहवाल आणि विमा संरक्षित क्षेत्रात तफावत आढळली.त्यामुळे कृषी आयुक्त कार्यालयाने कांदा आणि फळबागांची तपासणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने एक महिना जिल्ह्यात तपासणी राबवली. त्यामध्ये बोगस क्षेत्र आढळले. काही ठिकाणी कांदा आढळून आला नाही. तर कोठे लागवडीपेक्षा अधिक क्षेत्राचा विमा उतरवला. तसेच काही ठिकाणी एखाद्या क्षेत्राचा कांदा विमा काढून दुसरेच पीक घेतल्याचे समोर आले.

कृषी विभागाच्या कांदा तपासणीत ३ हजार १८३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षितमध्ये बरोबर आढळून आले. पण, ९ हजार २७८ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला तेथे कांदाच आढळला नाही. अशा लाभार्थींची संख्या १८ हजार ५१३ आहे. यामध्ये माण आणि खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर फळपिकांचाही यावर्षी मृग बहरात विमा उतरविण्यात आला होता.यासाठी शेतकऱ्यांना फळानुसार विम्यासाठी पाच टक्के रक्कम भरावी लागते. या फळपिकांतही बोगसपणा दिसला. तपासणीत विमा संरक्षित २६७ हेक्टर क्षेत्र बरोबर असल्याचे स्पष्ट झाले. पण, २२३ हेक्टरवरील फळबागांचा विमा बाेगस दिसून आला. अशा लाभार्थींची संख्या ५१७ इतकी आहे. यामध्ये माण तालुक्यात ४५२ लाभार्थी बोगस फळबाग विमाधारक आहेत.कांदा आणि फळपिकांत यंदा शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालीच नसती. पण, शासनाला विमा कंपनींना सुमारे साडेपाच कोटी रुपये हप्त्यापोटी द्यावे लागले असते. कृषी विभागाच्या तपासणीमुळे ते वाचले आहेत. तसेच जिल्हा सनियंत्रण समितीपुढे बोगस प्रस्ताव मांडल्यानंतर रद्दसाठी पाठविले होते. त्यामुळे कांद्याचा बोगस विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव रद्द झाले आहेत.

  • कांदा तपासणी गावे - ५१५
  • फळबाग तपासणी गावे - ७३
  • कांदा क्षेत्र आढळले नाही - ९,२७८ हेक्टर
  • फळबाग आढळली नाही - २२३ हेक्टर 

फळपीक तपासणीतालुका - तपासणी गावे - क्षेत्र नाही (हेक्टरमध्ये) - लाभार्थी

  • फलटण - १९ - २१ - ४६
  • खंडाळा - ३ - १ - ४
  • खटाव - ११ - ६ - १५
  • माण - ४० - १९६ - ४५२

कांदा तपासणी..तालुका - तपासणी गावे - क्षेत्र नाही (हेक्टरमध्ये) - लाभार्थी

  • फलटण - १२५ - १,१५२ - ८९८
  • खंडाळा - ५८ - १,४५५ - १,४५०
  • खटाव - १३८ - २,६४५ - ७,६१५
  • माण - १११ - ३,८२७ - ८,०६१
  • कोरेगाव - ८३ - १९९ - ४८८

सातारा जिल्ह्यात कांदा पीक पेरणी आणि विमा संरक्षित क्षेत्राची कृषी विभागाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक कारणांनी तफावत दिसून आली. हे सर्व प्रस्ताव रद्द झाले आहेत. त्यामुळे कांद्याचा शासनाला विमा संरक्षित हप्ता भरावा लागणार नाही. तसेच शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नसता. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढताना काळजी घ्यावी. पीक आहे त्याचाच विमा काढावा. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी