शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

सातारा जिल्ह्यात मोठी धरणे भरू लागली; नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:42 IST

सहा प्रकल्पात १२३ टीएमसी पाणी : कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर अन् उरमोडीत ८३ टक्के साठा 

सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील धरणे भरू लागली आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या सहा मोठ्या प्रकल्पात १२३ टीएमसीवर पाणीसाठा झाला होता. ही धरणे ८३ टक्के भरली होती. तर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाची उघडझाप सुरू झाली; पण मागील संपूर्ण आठवडा पावसाने गाजविला. पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत होता. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजासह कांदाटी खोऱ्यातील पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला. हा पाऊस मोठ्या धरणक्षेत्रातही सुरू होता. यामुळे धरणांतही मोठ्या प्रमाणात साठा वाढला. परिणामी धरणांमधून विसर्ग वाढवावा लागला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रमुख मोठे सहा प्रकल्प ८३ टक्के भरलेले आहेत.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४७, नवजा ४१ आणि महाबळेश्वरला ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणात ३८ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८५.४४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ८१.१८ धरण पाणीसाठ्याची टक्केवारी होती. तर धरणाचा पायथा वीजगृह २ हजार १०० आणि धरणाच्या सहा वक्रदरवाजातून २९ हजार ६४६ असा एकूण ३१ हजार ७४६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.

महाबळेश्वरला ३३०२ मिलिमीटरची नोंद..जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यादरम्यान पाऊस पडतो. यंदा एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे २ हजार ९३५ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजा येथे ३ हजार १८२ आणि महाबळेश्वरमध्ये ३ हजार ३०२ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सातारा शहरातही पावसाची उघडझाप कायम आहे.

प्रमुख धरणातून ४८ हजार क्युसेक विसर्ग..पश्चिम भागात पाऊस असल्याने कोयनासह प्रमुख धरणातून विसर्ग सुरूच आहे. सकाळच्या सुमारास धोम धरणातून ७ हजार १३१, बलकवडी ७४०, कण्हेर ४ हजार २९०, उरमोडी ५०० आणि तारळी धरणातून ३ हजार ५४९ क्युसेकने पाणी सोडले जात होते. त्यामुळे या सहा धरणातून एकूण ४७ हजार ९६२ क्युसेक पाणी विसर्ग होता. परिणामी वेण्णा, कोयना, उरमोडी तसेच कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, सध्या काही भागात पाऊस कमी झाल्याने विसर्गात घट होणार आहे.