शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

सातारा जिल्ह्यात शंभर टक्के निधी विकासकामांवर खर्च, जिल्हा नियोजनला मिळाला होता ५७५ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:01 IST

सातारा : जिल्हा नियोजन विभागाला २०२४-२५ वर्षासाठी ५७५ कोटींचा निधी मिळाला होता. मार्चअखेर हा निधी खर्च करण्याचे आव्हान असताना ...

सातारा : जिल्हा नियोजन विभागाला २०२४-२५ वर्षासाठी ५७५ कोटींचा निधी मिळाला होता. मार्चअखेर हा निधी खर्च करण्याचे आव्हान असताना मार्चपर्यंत ४२५ कोटी वितरित झाले होते, तर दीडशे कोटी निधी शिल्लक होता. तथापि, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा प्रशासनाने खर्चाचे योग्य नियोजन साधून उर्वरित दीडशे कोटीही खर्ची टाकले आहेत. आलेला संपूर्ण निधी विकासकामांसाठी खर्ची टाकून सातारा जिल्ह्यात राज्यात दिशादर्शक कामगिरी केली आहे.सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक यंत्रणेकडून २०२४-२५ वर्षासाठी ५७५ कोटींच्या कृती आराखड्याला शासनाने मंजुरी होती. प्रस्तावित आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० टक्के निधी मिळाला. उर्वरित निधीही टप्प्याटप्प्याने मिळाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. तथापि, वार्षिक योजनेतील प्रस्तावित कामे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करावी लागतात. अन्यथा, निधी परत जाण्याची भीती असते.

परंतु, सातारा जिल्ह्यामध्ये आचारसंहितेमुळे कामाला ब्रेक लागेल, याचा विचार करून प्रशासकीय मंजुऱ्या देण्यात आल्या. ९५ टक्के कामांना मंजुऱ्या मिळून निधी वितरीत करण्यात आला. आचारसंहितेचा अडसरही दूर होताच यंत्रणांनी प्रस्तावित विकासकामांना गती दिली. मार्च महिना लागेपर्यंत मंजूर ५७५ कोटींपैकी ४२५ कोटी निधी वितरीत करण्यात आला होता. त्यामुळे उर्वरित निधी खर्च करण्याचे आवाहन होते. हा निधीही मार्चअखेर शंभर टक्के खर्च करून सातारा जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.

२०२५-२५ साठी ८२० कोटींचा आराखडा

काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत सातारा जिल्ह्यासाठी ७१२.२५ कोटींचा, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत १०६.२८ कोटींचा व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत २.०८ कोटी अशा एकूण ८२०.७१ कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुदतीत प्रशासकीय मान्यता

  • जिल्हा नियोजन समितीने एप्रिल महिन्यात प्रस्तावित विकासकामांपैकी ९५ टक्के कामांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण झाल्याने कामांसाठी निधी वितरीत करणे व खर्ची टाकणे यात अडचण आली नाही व विकासकामांना ब्रेक अडचण आली नाही.
  • या वर्षात लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुका आल्या. शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे, तसेच आचारसंहिता लागू असल्याने निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान होते. तथापि, पालकमंत्र्यांच्या मागदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने योग्य निधीचे योग्य नियोजन केले.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlanning Commissionनियोजन आयोगfundsनिधी