शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात शंभर टक्के निधी विकासकामांवर खर्च, जिल्हा नियोजनला मिळाला होता ५७५ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:01 IST

सातारा : जिल्हा नियोजन विभागाला २०२४-२५ वर्षासाठी ५७५ कोटींचा निधी मिळाला होता. मार्चअखेर हा निधी खर्च करण्याचे आव्हान असताना ...

सातारा : जिल्हा नियोजन विभागाला २०२४-२५ वर्षासाठी ५७५ कोटींचा निधी मिळाला होता. मार्चअखेर हा निधी खर्च करण्याचे आव्हान असताना मार्चपर्यंत ४२५ कोटी वितरित झाले होते, तर दीडशे कोटी निधी शिल्लक होता. तथापि, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा प्रशासनाने खर्चाचे योग्य नियोजन साधून उर्वरित दीडशे कोटीही खर्ची टाकले आहेत. आलेला संपूर्ण निधी विकासकामांसाठी खर्ची टाकून सातारा जिल्ह्यात राज्यात दिशादर्शक कामगिरी केली आहे.सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक यंत्रणेकडून २०२४-२५ वर्षासाठी ५७५ कोटींच्या कृती आराखड्याला शासनाने मंजुरी होती. प्रस्तावित आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात ४० टक्के निधी मिळाला. उर्वरित निधीही टप्प्याटप्प्याने मिळाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. तथापि, वार्षिक योजनेतील प्रस्तावित कामे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करावी लागतात. अन्यथा, निधी परत जाण्याची भीती असते.

परंतु, सातारा जिल्ह्यामध्ये आचारसंहितेमुळे कामाला ब्रेक लागेल, याचा विचार करून प्रशासकीय मंजुऱ्या देण्यात आल्या. ९५ टक्के कामांना मंजुऱ्या मिळून निधी वितरीत करण्यात आला. आचारसंहितेचा अडसरही दूर होताच यंत्रणांनी प्रस्तावित विकासकामांना गती दिली. मार्च महिना लागेपर्यंत मंजूर ५७५ कोटींपैकी ४२५ कोटी निधी वितरीत करण्यात आला होता. त्यामुळे उर्वरित निधी खर्च करण्याचे आवाहन होते. हा निधीही मार्चअखेर शंभर टक्के खर्च करून सातारा जिल्ह्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.

२०२५-२५ साठी ८२० कोटींचा आराखडा

काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत सातारा जिल्ह्यासाठी ७१२.२५ कोटींचा, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत १०६.२८ कोटींचा व आदिवासी क्षेत्र बाह्य घटक कार्यक्रम अंतर्गत २.०८ कोटी अशा एकूण ८२०.७१ कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुदतीत प्रशासकीय मान्यता

  • जिल्हा नियोजन समितीने एप्रिल महिन्यात प्रस्तावित विकासकामांपैकी ९५ टक्के कामांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण झाल्याने कामांसाठी निधी वितरीत करणे व खर्ची टाकणे यात अडचण आली नाही व विकासकामांना ब्रेक अडचण आली नाही.
  • या वर्षात लोकसभा व विधानसभा अशा दोन निवडणुका आल्या. शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे, तसेच आचारसंहिता लागू असल्याने निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान होते. तथापि, पालकमंत्र्यांच्या मागदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने योग्य निधीचे योग्य नियोजन केले.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlanning Commissionनियोजन आयोगfundsनिधी