शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 12:17 IST

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे.

- श्रीनिवास नागे सांगली - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे. त्यातून जिल्ह्यातील आठपैकी चार ते पाच मतदारसंघांतील समीकरणे बदलणार आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांवर मते घेतली. त्यामुळे येथील सहा विधानसभा मतदारसंघांत आघाडी आणि युतीला या नव्या विरोधकाची धास्ती वाटू लागली आहे. सांगलीत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ पुन्हा मैदानात असतील. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी डोंगरे यांना ‘वंचित’तर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीकडून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई मदन पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मिरज राखीव मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. काँग्रेसने ‘वंचित’शी आघाडी केल्यास ही जागा ‘वंचित’ला वा ‘स्वाभिमानी’साठी सोडली जाईल. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांतीलच नाव ‘वंचित’ किंवा ‘स्वाभिमानी’कडून पुढे येऊ शकते.विशाल पाटील व आ. विश्वजित कदम यांची भूमिका सांगली तसेच मिरजेतील काँग्रेसचा उमेदवार निवडण्यात निर्णायक ठरणार आहे.जतमध्ये भाजपचे आ. विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत विरोध वाढत असून, दुसऱ्या गटाकडून डॉ. रवींद्र आरळी, तम्मणगौडा रवी-पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. काँग्रेसचे विक्रम सावंत पुन्हा तयारीत आहेत. लोकसभेला ‘वंचित’ने येथे दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे माजी आमदार प्रकाश शेंडगे, अशोक बन्नेनवार या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील व अजितराव घोरपडे यांची लढत निश्चित दिसते. खा. संजयकाका पाटील यांचे हे ‘होम ग्राऊंड’ असून, त्यांची ताकद कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. धनगर समाजामुळे येथेही ‘वंचित फॅक्टर’ चालणार आहे.खानापुरात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी भाजप व खासदार गटाशी जुळवून घेतले आहे. पण भाजपमध्ये असलेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. काँग्रेसकडून माजी आमदार सदाशिवराव पाटील तयारीत आहेत. गोपीचंद पडळकर यांचे ‘होम पिच’ असून ते स्वत: लढणार की, कोणाला पाठिंबा देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून आ. विश्वजित कदम व भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यातील सामना वर्षभरापूर्वीच ठरला आहे. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांना तगडी लढत देण्यासाठी राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना कसे थांबवणार, हा प्रश्न आघाडीसमोर आहे. तेथे सम्राट महाडिक यांनी आधीच उमेदवारी जाहीर करून युतीसमोर पेच निर्माण केला आहे.जयंत पाटील यांना शह देणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने चाल रचण्यास सुरुवात केली आहे. आ. पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा चंग महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, गौरव नायकवडी येथून इच्छुक आहेत.२०१४ मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय : इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी) १,१३,०४५. प्रतिस्पर्धी उमेदवार : अभिजित पाटील (अपक्ष) ३७,८५९. फरक : ७५१८६सर्वांत कमी मतांनी विजय : शिराळा : शिवाजीराव नाईक (भाजप) ८५,३६३. प्रतिस्पर्धी उमेदवार : मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) ८१,६९५. फरक : ३६६८एकूण जागा : ८  सध्याचे बलाबलभाजपा - ४, शिवसेना - १, राष्ट्रवादी - २, काँग्रेस - १

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस