शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

'वंचित'मुळे युती, आघाडी चिंतीत; बदलणार पाच मतदारसंघांचं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 12:17 IST

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे.

- श्रीनिवास नागे सांगली - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीतही त्यांचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युतीसमोर उभे राहणार आहे. त्यातून जिल्ह्यातील आठपैकी चार ते पाच मतदारसंघांतील समीकरणे बदलणार आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांवर मते घेतली. त्यामुळे येथील सहा विधानसभा मतदारसंघांत आघाडी आणि युतीला या नव्या विरोधकाची धास्ती वाटू लागली आहे. सांगलीत भाजपचे आ. सुधीर गाडगीळ पुन्हा मैदानात असतील. जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी डोंगरे यांना ‘वंचित’तर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीकडून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई मदन पाटील यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.मिरज राखीव मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. काँग्रेसने ‘वंचित’शी आघाडी केल्यास ही जागा ‘वंचित’ला वा ‘स्वाभिमानी’साठी सोडली जाईल. अर्थात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांतीलच नाव ‘वंचित’ किंवा ‘स्वाभिमानी’कडून पुढे येऊ शकते.विशाल पाटील व आ. विश्वजित कदम यांची भूमिका सांगली तसेच मिरजेतील काँग्रेसचा उमेदवार निवडण्यात निर्णायक ठरणार आहे.जतमध्ये भाजपचे आ. विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत विरोध वाढत असून, दुसऱ्या गटाकडून डॉ. रवींद्र आरळी, तम्मणगौडा रवी-पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. काँग्रेसचे विक्रम सावंत पुन्हा तयारीत आहेत. लोकसभेला ‘वंचित’ने येथे दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे माजी आमदार प्रकाश शेंडगे, अशोक बन्नेनवार या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील व अजितराव घोरपडे यांची लढत निश्चित दिसते. खा. संजयकाका पाटील यांचे हे ‘होम ग्राऊंड’ असून, त्यांची ताकद कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. धनगर समाजामुळे येथेही ‘वंचित फॅक्टर’ चालणार आहे.खानापुरात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी भाजप व खासदार गटाशी जुळवून घेतले आहे. पण भाजपमध्ये असलेले माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. काँग्रेसकडून माजी आमदार सदाशिवराव पाटील तयारीत आहेत. गोपीचंद पडळकर यांचे ‘होम पिच’ असून ते स्वत: लढणार की, कोणाला पाठिंबा देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून आ. विश्वजित कदम व भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यातील सामना वर्षभरापूर्वीच ठरला आहे. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांना तगडी लढत देण्यासाठी राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. मात्र काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना कसे थांबवणार, हा प्रश्न आघाडीसमोर आहे. तेथे सम्राट महाडिक यांनी आधीच उमेदवारी जाहीर करून युतीसमोर पेच निर्माण केला आहे.जयंत पाटील यांना शह देणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने चाल रचण्यास सुरुवात केली आहे. आ. पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा चंग महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधला आहे. निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, गौरव नायकवडी येथून इच्छुक आहेत.२०१४ मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय : इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी) १,१३,०४५. प्रतिस्पर्धी उमेदवार : अभिजित पाटील (अपक्ष) ३७,८५९. फरक : ७५१८६सर्वांत कमी मतांनी विजय : शिराळा : शिवाजीराव नाईक (भाजप) ८५,३६३. प्रतिस्पर्धी उमेदवार : मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) ८१,६९५. फरक : ३६६८एकूण जागा : ८  सध्याचे बलाबलभाजपा - ४, शिवसेना - १, राष्ट्रवादी - २, काँग्रेस - १

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस