शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार : अतुल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:06 IST

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत.

ठळक मुद्देसांगलीत ‘क्रेडाई’च्या कार्यक्रमास प्रतिसाद

सांगली : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. हे बदल मान्य करावेच लागणार आहेत. त्यामुळे ‘जुनं ते सोनं’ ही म्हण विसरून नव्याने येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी सांगलीत केले.

‘क्रेडाई’ सांगलीच्यावतीने येथील कल्पद्रुम मैदानावर आयोजित ‘ड्रीम होम २०१८’ या वास्तुविषयक प्रदर्शनात ‘सांगली ब्रॅँडिंग, नवोदित उद्योजकांसमोरील आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. के्रडाईचे अध्यक्ष विकास लागू यांच्यासह उपस्थित सांगलीकरांनीही त्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारून मत जाणून घेतले.कुलकर्णी म्हणाले, भारत हा तरुणांचा देश असला तरी, स्वत:ची विचारप्रक्रिया तयार व्हावी, ज्याव्दारे निर्णयक्षमता वाढविणाºया शिक्षणाची खरी गरज आहे. मात्र, ते मिळत नसल्याने तरुण म्हणजे बॉम्बच ठरणार आहेत.

माझ्याकडे काय आहे, यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या लोकांकडे काय आहे, हे पाहण्याची मानसिकता वाढत आहे. संपत्ती मिळविण्यापेक्षा लोकांना दिसणारी संपत्ती असावी, याकडे ओढा वाढत आहे. आपले सुख कशात हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. पूर्वीही बदल होत गेले, मात्र आता त्याचा वेग वाढलेला आहे. पैसा हे साधन असताना, ते आता साध्य बनले आहे.

ते म्हणाले की, आता अनेकांच्या असलेल्या नोकºया, व्यवसाय येत्या २० वर्षांत असणार नाहीत. आजची शिक्षण पध्दतीही भविष्यात निकामी ठरणार आहे. एका व्यक्तीला तीन ते चार व्यवसाय करावे लागणार आहेत. यातून निर्माण होणारा ताण कसा कमी करायचा, हेच त्यावेळचे आव्हान असणार आहे. भविष्याचा वेध घेणाºया नोकरी, व्यवसायाची आज समाजाला सर्वाधिक गरज आहे.यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष रवींद्र खिलारे व पदाधिकारी उपस्थित होते.अभिनय व्यवसाय बेभरवशाचाकुलकर्णी म्हणाले, प्रत्येक व्यवसायात ‘बॅड पॅच’ असतोच. त्यावर मात कशी करायची, हे तंत्र समजणे आवश्यक आहे. बिल्डर्सही आता याविषयी बोलू लागले असले तरी सर्वाधिक बेभरवशाचा व्यवसाय अभिनयाचा आहे. शेतकरी आणि अभिनेता या दोघांचीही स्थिती सारखीच आहे. कष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाचा भाव पडतो, तसाच वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही तर त्याचा अभिनेत्यांना फटका बसतो. 

टॅग्स :SangliसांगलीAtul Kulkarniअतुल कुलकर्णी