शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार : अतुल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:06 IST

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत.

ठळक मुद्देसांगलीत ‘क्रेडाई’च्या कार्यक्रमास प्रतिसाद

सांगली : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. हे बदल मान्य करावेच लागणार आहेत. त्यामुळे ‘जुनं ते सोनं’ ही म्हण विसरून नव्याने येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी सांगलीत केले.

‘क्रेडाई’ सांगलीच्यावतीने येथील कल्पद्रुम मैदानावर आयोजित ‘ड्रीम होम २०१८’ या वास्तुविषयक प्रदर्शनात ‘सांगली ब्रॅँडिंग, नवोदित उद्योजकांसमोरील आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. के्रडाईचे अध्यक्ष विकास लागू यांच्यासह उपस्थित सांगलीकरांनीही त्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारून मत जाणून घेतले.कुलकर्णी म्हणाले, भारत हा तरुणांचा देश असला तरी, स्वत:ची विचारप्रक्रिया तयार व्हावी, ज्याव्दारे निर्णयक्षमता वाढविणाºया शिक्षणाची खरी गरज आहे. मात्र, ते मिळत नसल्याने तरुण म्हणजे बॉम्बच ठरणार आहेत.

माझ्याकडे काय आहे, यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या लोकांकडे काय आहे, हे पाहण्याची मानसिकता वाढत आहे. संपत्ती मिळविण्यापेक्षा लोकांना दिसणारी संपत्ती असावी, याकडे ओढा वाढत आहे. आपले सुख कशात हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. पूर्वीही बदल होत गेले, मात्र आता त्याचा वेग वाढलेला आहे. पैसा हे साधन असताना, ते आता साध्य बनले आहे.

ते म्हणाले की, आता अनेकांच्या असलेल्या नोकºया, व्यवसाय येत्या २० वर्षांत असणार नाहीत. आजची शिक्षण पध्दतीही भविष्यात निकामी ठरणार आहे. एका व्यक्तीला तीन ते चार व्यवसाय करावे लागणार आहेत. यातून निर्माण होणारा ताण कसा कमी करायचा, हेच त्यावेळचे आव्हान असणार आहे. भविष्याचा वेध घेणाºया नोकरी, व्यवसायाची आज समाजाला सर्वाधिक गरज आहे.यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष रवींद्र खिलारे व पदाधिकारी उपस्थित होते.अभिनय व्यवसाय बेभरवशाचाकुलकर्णी म्हणाले, प्रत्येक व्यवसायात ‘बॅड पॅच’ असतोच. त्यावर मात कशी करायची, हे तंत्र समजणे आवश्यक आहे. बिल्डर्सही आता याविषयी बोलू लागले असले तरी सर्वाधिक बेभरवशाचा व्यवसाय अभिनयाचा आहे. शेतकरी आणि अभिनेता या दोघांचीही स्थिती सारखीच आहे. कष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाचा भाव पडतो, तसाच वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही तर त्याचा अभिनेत्यांना फटका बसतो. 

टॅग्स :SangliसांगलीAtul Kulkarniअतुल कुलकर्णी