शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार : अतुल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:06 IST

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत.

ठळक मुद्देसांगलीत ‘क्रेडाई’च्या कार्यक्रमास प्रतिसाद

सांगली : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. हे बदल मान्य करावेच लागणार आहेत. त्यामुळे ‘जुनं ते सोनं’ ही म्हण विसरून नव्याने येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी सांगलीत केले.

‘क्रेडाई’ सांगलीच्यावतीने येथील कल्पद्रुम मैदानावर आयोजित ‘ड्रीम होम २०१८’ या वास्तुविषयक प्रदर्शनात ‘सांगली ब्रॅँडिंग, नवोदित उद्योजकांसमोरील आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. के्रडाईचे अध्यक्ष विकास लागू यांच्यासह उपस्थित सांगलीकरांनीही त्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारून मत जाणून घेतले.कुलकर्णी म्हणाले, भारत हा तरुणांचा देश असला तरी, स्वत:ची विचारप्रक्रिया तयार व्हावी, ज्याव्दारे निर्णयक्षमता वाढविणाºया शिक्षणाची खरी गरज आहे. मात्र, ते मिळत नसल्याने तरुण म्हणजे बॉम्बच ठरणार आहेत.

माझ्याकडे काय आहे, यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या लोकांकडे काय आहे, हे पाहण्याची मानसिकता वाढत आहे. संपत्ती मिळविण्यापेक्षा लोकांना दिसणारी संपत्ती असावी, याकडे ओढा वाढत आहे. आपले सुख कशात हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. पूर्वीही बदल होत गेले, मात्र आता त्याचा वेग वाढलेला आहे. पैसा हे साधन असताना, ते आता साध्य बनले आहे.

ते म्हणाले की, आता अनेकांच्या असलेल्या नोकºया, व्यवसाय येत्या २० वर्षांत असणार नाहीत. आजची शिक्षण पध्दतीही भविष्यात निकामी ठरणार आहे. एका व्यक्तीला तीन ते चार व्यवसाय करावे लागणार आहेत. यातून निर्माण होणारा ताण कसा कमी करायचा, हेच त्यावेळचे आव्हान असणार आहे. भविष्याचा वेध घेणाºया नोकरी, व्यवसायाची आज समाजाला सर्वाधिक गरज आहे.यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष रवींद्र खिलारे व पदाधिकारी उपस्थित होते.अभिनय व्यवसाय बेभरवशाचाकुलकर्णी म्हणाले, प्रत्येक व्यवसायात ‘बॅड पॅच’ असतोच. त्यावर मात कशी करायची, हे तंत्र समजणे आवश्यक आहे. बिल्डर्सही आता याविषयी बोलू लागले असले तरी सर्वाधिक बेभरवशाचा व्यवसाय अभिनयाचा आहे. शेतकरी आणि अभिनेता या दोघांचीही स्थिती सारखीच आहे. कष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाचा भाव पडतो, तसाच वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही तर त्याचा अभिनेत्यांना फटका बसतो. 

टॅग्स :SangliसांगलीAtul Kulkarniअतुल कुलकर्णी