शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

Sangli: म्हैसाळ येथील बॅरेजमुळे शेतकऱ्यांचे संकट गहिरे, नेमके पाणी किती अडणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:00 IST

नदीकाठच्या गावकऱ्यांत भीती

सुशांत घोरपडेम्हैसाळ : कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयावर ठाम असून, दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेजवळ नवीन एक टीएमसी बॅरेज उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पाणी पातळी जास्त राहिली तर कृष्णा खोऱ्यातील नदीकाठच्या गावांवर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावातील शेतजमिनी पाण्याखाली जाण्याची भीती अनेक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या काही गावांचा समावेश आहे.हे प्रकल्प झाल्यानंतर पाणी किती अडणार ? नदीची पाणी पातळी किती राहणार ? पावसाळ्यात पाणी पातळी किती असणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.म्हैसाळ येथे बांधल्या जाणाऱ्या नव्या बॅरेजमुळे मागे कसबे डिग्रजपर्यंत बँक वॉटरची पातळी वाढणार असून म्हैसाळ, कनवाड, कुटवाड, ढवळी, अर्जुनवाड या गावातील शेतजमिनी जलमय होण्याची भीती आहे.यांचा फटका शेतकऱ्यांबरोबर व्यापारी व लघुउद्योग क्षेत्रालाही बसणार आहे. "सिंचनाचे फायदे काही मर्यादित ठिकाणी होत असले तरी त्याचा खालच्या भागातील जनजीवनावर मोठा विपरित परिणाम होणार आहे," असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने भविष्यात होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करूनच पुढील पावले टाकावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पावसाळ्यामध्ये जलसंपदा विभाग हा धरणातील गेट खुले करते, त्यामुळे म्हैसाळ येथे नव्याने होत असलेल्या बॅरेजमुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. - प्रभाकर केंगार, सेवानिवृत्त, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, सांगली 

एकीकडे अलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकार वाढवत आहे. दुसरीकडे म्हैसाळ येथे नवीन बॅरेजचे काम सुरू आहे.हे दोन्ही प्रकल्प झाल्यानंतर पावसाळ्यात नेमके पाणी किती अडणार ? नदी पात्रात पाणी पातळी किती राहणार ? याबाबत कोणतीही कल्पना आम्हाला नाही. पावसाळ्यात पाणी पातळी जास्त राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ