शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

Sangli: म्हैसाळ येथील बॅरेजमुळे शेतकऱ्यांचे संकट गहिरे, नेमके पाणी किती अडणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:00 IST

नदीकाठच्या गावकऱ्यांत भीती

सुशांत घोरपडेम्हैसाळ : कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयावर ठाम असून, दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेजवळ नवीन एक टीएमसी बॅरेज उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पाणी पातळी जास्त राहिली तर कृष्णा खोऱ्यातील नदीकाठच्या गावांवर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावातील शेतजमिनी पाण्याखाली जाण्याची भीती अनेक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या काही गावांचा समावेश आहे.हे प्रकल्प झाल्यानंतर पाणी किती अडणार ? नदीची पाणी पातळी किती राहणार ? पावसाळ्यात पाणी पातळी किती असणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.म्हैसाळ येथे बांधल्या जाणाऱ्या नव्या बॅरेजमुळे मागे कसबे डिग्रजपर्यंत बँक वॉटरची पातळी वाढणार असून म्हैसाळ, कनवाड, कुटवाड, ढवळी, अर्जुनवाड या गावातील शेतजमिनी जलमय होण्याची भीती आहे.यांचा फटका शेतकऱ्यांबरोबर व्यापारी व लघुउद्योग क्षेत्रालाही बसणार आहे. "सिंचनाचे फायदे काही मर्यादित ठिकाणी होत असले तरी त्याचा खालच्या भागातील जनजीवनावर मोठा विपरित परिणाम होणार आहे," असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने भविष्यात होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करूनच पुढील पावले टाकावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पावसाळ्यामध्ये जलसंपदा विभाग हा धरणातील गेट खुले करते, त्यामुळे म्हैसाळ येथे नव्याने होत असलेल्या बॅरेजमुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. - प्रभाकर केंगार, सेवानिवृत्त, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, सांगली 

एकीकडे अलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकार वाढवत आहे. दुसरीकडे म्हैसाळ येथे नवीन बॅरेजचे काम सुरू आहे.हे दोन्ही प्रकल्प झाल्यानंतर पावसाळ्यात नेमके पाणी किती अडणार ? नदी पात्रात पाणी पातळी किती राहणार ? याबाबत कोणतीही कल्पना आम्हाला नाही. पावसाळ्यात पाणी पातळी जास्त राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. - एम. डी. पाटील, शेतकरी, म्हैसाळ