शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी सांगलीतील महिलांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:50 IST

आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी बुधगाव (ता. मिरज) येथील महिला शेतकऱ्यांनी मंगळवारी स्वत:च्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली. आम्हाला भूमिहीन करून शक्तिपीठ महामार्ग कशासाठी करत आहे? असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.बाधित शेतकऱ्यांची महिलासह बुधगाव येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली. या ठिकाणी एकत्र येऊन महिला शेतकऱ्यांनी आपले रक्त बाटलीत काढले व बोरुने माझी जमीन बागायती आहे. सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार केल्या आहेत. त्यामुळे माझी जमीन प्रस्तावित महामार्गासाठी द्यायची नाही. तसेच या महामर्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे. सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली.

किसानसभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही, असे विधान केले होते. तसेच कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनीही शक्तिपीठ महामार्ग होणारच असे विधान केले आहे. आजपर्यंत क्षीरसागर गप्प का होते?. कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केल्यानंतरही ते बोलले नाहीत? शक्तिपीठचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठून आला? हिम्मत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी हे विधान करायचे होते.सर्व आमदारांशी चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणतायत मग सांगलीचे आमदार, खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात. याचे उत्तर मुख्यमंत्री देतील काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदने पाठविली आहेत. ती त्यांनी वाचली नाहीत का? असे संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उमेश एडके, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, अनिल डुबल, रामदास पाटील, वैशाली पाटील सरपंच, शुभांगी शिंदे, उपसरपंच वनिता पाटील, तृप्ती पाटील, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

घरादारावर नांगर फिरविण्याची धोरण बदला : महेश खराडेविकासाच्या गप्पा मारून शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे राज्य सरकारची धोरण असून ते उधळून लावले जातील. विकासाचे कारण पुढे करुन शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही, असा आरोपही महेश खराडे यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गChief Ministerमुख्यमंत्री