शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

lok sabha: मत विभाजन टाळणार, वंचित-'स्वाभिमानी'लाही बरोबर घेणार - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 12:04 IST

मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास लोकशाही संपेल

सांगली : देशातील एकूण मताच्या ३४ टक्केपर्यंत मतदार भाजपकडे आहे. उर्वरित ६६ टक्के मतदारांचे विभाजन टाळण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न असून त्यासाठीच ४५० जागांवर तुल्यबळ आणि एकास एक उमेदवार देण्यावर भर असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत देशात सत्तांतर करण्याचा निश्चय करून इंडिया आघाडीतील २८ पक्ष कामाला जागले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, निवडणुकीचे गणित साधे आहे. २०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के तर २०१९ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते. बालकोट प्रकरणामुळे २०१९ ला मते वाढली होती. आता तसे वातावरण नाही. राम मंदिराच्या बाबतीत राजीव गांधी यांनीच प्रथम मंदिराचे दरवाजे उघडले होते. मात्र न्यायालयाकडून ज्यांना जमीन मिळेल, त्यांना समर्थन काँग्रेस करेल, अशी भूमिका होती, तीच आहे.

सध्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभा राहत असून त्याचा आम्हाला आनंद आहे; पण निवडणुकीत रोजगार, महागाई, भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे त्यांची मते ३४ टक्केच असणार आहेत. उर्वरित सर्व घटक पक्षांना एकत्रित करून ६६ टक्के मते खचून एकास एक तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी धोरण निश्चित केले आहे.महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आमचेच आहेत; पण, अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनाही बरोबर घेतले आहे. वंचित, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही इंडिया आघाडीबरोबरच असणार असून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.

मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास लोकशाही संपेलभाजपने मागील दोन लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिलेली आश्वासन पाळले नाहीत. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढल्या आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनाधार घटला आहे. यातूनही ते पुन्हा सत्तेवर आल्यास देशाची लोकशाही धोक्यात येईल. रशियात पुतीनने केले, चीनमध्ये सद्या जे चालले आहे, तेच भारतात होईल की काय अशी भीती वाटू लागलीय, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..

  • सांगली लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो तसाच राहिल. मागील लोकसभा निवडणुकीची चूक आता होणार नाही.
  • ईडीच्या माध्यमातून दहशत, धमक्या देण्याचा प्रयत्न
  • मराठा आंदोलकांना सरकारने योग्य वागणूक द्यावी
  • ओबीसी विरुद्ध मराठा भांडणे लावण्याचे काम सध्या सुरू
  • ईव्हीएम यंत्राबाबत मतदारांना शंका असल्यामुळे बऱ्याच देशांनी नाकारले आहे.
  • प्रामाणिकपणे लढणार असाल, तर वंचितने इंडिया आघाडीशी चर्चा करावी.
टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना