शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मुख्यमंत्र्यांना सांगलीबद्दल द्वेष का? : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:18 IST

महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला.

ठळक मुद्देबळ नसल्यानेच भाजपकडून पोलीस बळाचा वापर

सांगली : महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेतीन वर्षात कधीही सांगलीला आले नाहीत. सांगलीकरांबद्दल त्यांच्या मनात द्वेष का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पाटील म्हणाले की, निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घातला पाहिजे. पण प्रशासन एककल्ली कारवाया करीत आहेत. मिरजेत रात्रीच्या सुमारास काँग्रेस उमेदवारांच्या घरात घुसून चित्रिकरण केले गेले. पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या धमक्या दिल्या जात आहेत. ख्रिश्चन समाजातील एका व्यक्तीला तर पोलीस ठाण्यात तीन दिवस बसवून घेऊन जाब विचारला गेला. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत, हे पाहून आता पोलीस बळाचा वापर केला जात आहे. यात अधिकाऱ्यांचा दोष नाही. तरीही मुख्यमंत्री, मंत्री, सत्ताधाºयांना खूश करण्यासाठी काही वेगळे प्रकार सुरू आहेत. आम्ही दाखवतो, त्या घरांची झडती त्यांनी घ्यावी, प्रशासनाने त्याचा अतिरेक करू नये.

भाजपने जनतेचा विश्वास गमावला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर ते अपयशी ठरले आहेत. महागाई, पेट्रोल दरवाढीने जनता हैराण झाली आहे. त्यामुळेच भाजपला जनतेचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस सांगलीला आले नसावेत. गेल्या साडेतीन वर्षात ते कधीही सांगलीला आले नाहीत. ते सांगलीकरांचा इतका द्वेष का करतात, असा टोला लगावत पाटील म्हणाले की, या शहरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडीचा निर्णय घेतला आहे. आमचा जाहीरनामा सामान्य लोक केंद्रबिंदू मानून तयार केला आहे. त्याची निश्चित पूर्ती केली जाईल.मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूलमुख्यमंत्र्यांचा एक संदेश व्हायरल झाला आहे. त्यात ते स्क्रीनवर वाचून संदेश देत असल्याचे दिसते. त्यांनी सांगितलेली आकडेवारीही चुकीची आहे. ट्रक टर्मिनलला ते ट्रॅक टर्मिनल म्हणाले. ते हुशार आहेत. पण त्यांची कुणीतरी दिशाभूल केली असावी. आम्ही सुरू केलेल्या अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी संदेशात केला आहे. या योजनांचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.बातमीला जोड....ईव्हीएमची आधी तपासणी व्हावीईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी ईव्हीएमची तपासणी सर्वपक्षीय उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर व्हावी. थेट केंद्रावर ईव्हीएमची तपासणी करून मतदान प्रक्रिया सुरू करू नये, असे पत्र प्रशासनाला दिले आहे. मतांची बेरीज करतानाही ५० नव्हे, तर ५०० मते ईव्हीएमवर टाकली जावीत, असेही पाटील म्हणाले. जनतेचा प्रतिसाद नसल्याने भाजपचा ईव्हीएम हा शेवटचा पर्याय असू शकतो, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगलीElectionनिवडणूकPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस