शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

मुख्यमंत्र्यांना सांगलीबद्दल द्वेष का? : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 21:18 IST

महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला.

ठळक मुद्देबळ नसल्यानेच भाजपकडून पोलीस बळाचा वापर

सांगली : महापालिका क्षेत्रात भाजपकडे बळ उरलेले नाही. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून दोन्ही काँग्रेसच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साडेतीन वर्षात कधीही सांगलीला आले नाहीत. सांगलीकरांबद्दल त्यांच्या मनात द्वेष का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पाटील म्हणाले की, निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घातला पाहिजे. पण प्रशासन एककल्ली कारवाया करीत आहेत. मिरजेत रात्रीच्या सुमारास काँग्रेस उमेदवारांच्या घरात घुसून चित्रिकरण केले गेले. पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या धमक्या दिल्या जात आहेत. ख्रिश्चन समाजातील एका व्यक्तीला तर पोलीस ठाण्यात तीन दिवस बसवून घेऊन जाब विचारला गेला. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून येणार नाहीत, हे पाहून आता पोलीस बळाचा वापर केला जात आहे. यात अधिकाऱ्यांचा दोष नाही. तरीही मुख्यमंत्री, मंत्री, सत्ताधाºयांना खूश करण्यासाठी काही वेगळे प्रकार सुरू आहेत. आम्ही दाखवतो, त्या घरांची झडती त्यांनी घ्यावी, प्रशासनाने त्याचा अतिरेक करू नये.

भाजपने जनतेचा विश्वास गमावला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर ते अपयशी ठरले आहेत. महागाई, पेट्रोल दरवाढीने जनता हैराण झाली आहे. त्यामुळेच भाजपला जनतेचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस सांगलीला आले नसावेत. गेल्या साडेतीन वर्षात ते कधीही सांगलीला आले नाहीत. ते सांगलीकरांचा इतका द्वेष का करतात, असा टोला लगावत पाटील म्हणाले की, या शहरात नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडीचा निर्णय घेतला आहे. आमचा जाहीरनामा सामान्य लोक केंद्रबिंदू मानून तयार केला आहे. त्याची निश्चित पूर्ती केली जाईल.मुख्यमंत्र्यांचीच दिशाभूलमुख्यमंत्र्यांचा एक संदेश व्हायरल झाला आहे. त्यात ते स्क्रीनवर वाचून संदेश देत असल्याचे दिसते. त्यांनी सांगितलेली आकडेवारीही चुकीची आहे. ट्रक टर्मिनलला ते ट्रॅक टर्मिनल म्हणाले. ते हुशार आहेत. पण त्यांची कुणीतरी दिशाभूल केली असावी. आम्ही सुरू केलेल्या अनेक योजनांचा उल्लेख त्यांनी संदेशात केला आहे. या योजनांचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला.बातमीला जोड....ईव्हीएमची आधी तपासणी व्हावीईव्हीएमबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी ईव्हीएमची तपासणी सर्वपक्षीय उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर व्हावी. थेट केंद्रावर ईव्हीएमची तपासणी करून मतदान प्रक्रिया सुरू करू नये, असे पत्र प्रशासनाला दिले आहे. मतांची बेरीज करतानाही ५० नव्हे, तर ५०० मते ईव्हीएमवर टाकली जावीत, असेही पाटील म्हणाले. जनतेचा प्रतिसाद नसल्याने भाजपचा ईव्हीएम हा शेवटचा पर्याय असू शकतो, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSangliसांगलीElectionनिवडणूकPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस