शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गेल्या ७० वर्षात मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्याचे नाव सांगा, मनोज जरांगे-पाटील यांचे सरकारला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 14:28 IST

विट्यातील विराट सभेत सरकारला इशारा

दिलीप मोहिते

विटा : मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठा समाज आज एकवटला आहे. त्यामुळे सरकार आता पुरावे शोधू लागले आहे. गेली ७० वर्षे ओबीसी नेत्यांचा सरकारवर प्रभाव होता. परंतु, आता सरकारला मराठ्यांचे पुरावे सापडू लागले आहेत. मराठ्यांना आरक्षण न देता त्यांना दाबून मारण्याचा कोणी प्रयत्न केला? गेल्या ७० वर्षापासून मराठ्यांचे वाटोळे कोणी केले, त्याचे नाव आता आम्हाला कळायला पाहिजे, असे आव्हान मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिले. यावेळी त्यांनी राजकारणातील भाऊसाहेब, भैय्यासाहेब यांच्या मागे न लागता लेकरांना अभ्यासाकडे वळवावे, असा सल्ला मराठ्यांना दिला.मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची सांगली जिल्ह्यातील विटा येथे पहिली सभा शुक्रवारी सकाळी झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाज एकवटला होता. शहरात अक्षरश: भगवे वादळ आले होते. जरांगे-पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता सभास्थळी आगमन झाले. त्यावेळी धनगर समाजाच्यावतीने मराठा आरक्षणाला पाठींबा देत जरांगे-पाटील यांचा घोंगडे व घुंगराची काठी देऊन सत्कार करण्यात आला.मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ज्या जातीने आरक्षण समजून घेतले त्यांना लगेच आरक्षण मिळाले. पण मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यायला वेळ लावला. पण वेळाने का होईना मराठा समाज एकत्रीत आला आहे. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर सरकारला यापुढील काळ जड जाईल. परंतु, आता आरक्षणाची ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे.गेली ७० वर्षे ओबीसींच्या नेत्यांचा सरकारवर प्रचंड प्रभाव होता. त्यावेळी आमचे पुरावे त्यांनी स्वत:च्या बुडाखाली लपवून ठेवले आणि प्रत्येकवेळी पुरावे नसल्याचे सांगत मराठ्यांना आरक्षण देता येत नसल्याचा कांगावा केला. पण आता घरा-घरातील मराठे एकवटले आहेत. सरकारनेही पुरावे शोधायला सुरूवात केली असून लाखो पुरावे मिळाले आहेत.त्यामुळे सरकारला आमचा प्रश्न आहे की, १८२२ पासून १९६७ पर्यंत आणि १९६७ पासून २०२३ पर्यंत जे काही पुरावे सापडले आहेत. त्याच्या आधारावर तुम्ही गेल्या ७० वर्षापूर्वीच आरक्षण दिले असते तर आज मराठ्यांची जगात प्रगत जात झाली असती. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, याचे उत्तर सरकारकडे नाही. मराठा समाजाने सर्व निकष पूर्ण करूनही त्यांना आरक्षण का नाही?मराठा नेत्यांबाबत बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले, गेल्या ७० वर्षात सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आमच्या बापजाद्यांनी मोठे केले. आज लेकरांसाठी या नेत्यांच्या मदतीची गरज असताना एकही नेता बोलायला तयार नाही. परंतु, या नेत्यांशिवाय मराठा समाजाने आज ७० टक्के लढाई जिंकली आहे. आनंदाचा क्षण आता जवळ आला आहे. दि. २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. लेकरासाठी लढा आहे.आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नका. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही. मतभेद आणि एकजूट तूटू देऊ नका, मराठ्यांच्या त्सुनामी विरोधात जायचे कोणीही धाडस करणार नाही. विजय आपलाच आहे. जो आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याला सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला.या सभेसाठी विटा शहरात सकाळपासून गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. सभेसाठी येणाºया लोकांसाठी शहरात ठिकठिकाणी बिस्कीट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मराठा समाज कृती समितीचे समन्वयक शंकर मोहिते, विनोद पाटील, दहावीर शितोळे, शशिकांत शिंदे, अजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी नेटके नियोजन केले होते. डॉ. जितेश कदम, सुहास बाबर यांच्यासह लाखो संख्येने मराठा समाजाने हजेरी लावली होती.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील