शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 3:28 AM

पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले; राजारामबापू पाटील जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ

इस्लामपूर (जि. सांगली) : काही लोक सोडून गेले, त्याची चिंता नाही. कामे होत नाहीत, अशा सबबी काहींनी सांगितल्या. मात्र सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे. सत्ता नसली तरी कामाशी बांधिलकी असेल, तर लोकांचा पाठिंबा मिळतोच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारले. राजारामबापूंच्या विचाराने पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींच्या उपस्थितीत झाला. पवार म्हणाले की, राजारामबापूंनी उद्योग आणि वीजमंत्री असताना ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा पाया भक्कम केला. स्थानिकांना रोजगार देण्याचे काम केले. जनता पक्षात गेल्यावर त्यांनी प्रभावी विरोधक म्हणून काम करुन दाखवले. आज देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर होत आहे. जातीपातीवरुन माणसांवरच हल्ले होत आहेत. संकट बाजूला करुन देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, बापूंच्या रक्तात काँगे्रस होती. त्यानंतर ते जनता पक्षात गेले तरी, आम्ही सर्वांनी मिळून समाजवादी विचारधारा भक्कम करण्याचे काम केले. कन्हैया कुमार म्हणाले की, इंग्रजांना पळवून लावताना जितके कष्ट पडले, त्यापेक्षा अधिक प्रयत्न आणि कष्ट भाजपला पळवून लावताना करावे लागणार आहेत. बापूंच्या विचारांचे बोट धरुन बलशाली हिंदुस्थानची उभारणी करावी लागेल. जयंत पाटील म्हणाले, बापूंनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले. राजकारणात चांगले-वाईट दिवस येतात. मात्र संकटात साथदेतो, तो खरा कार्यकर्ता, ही बापूंची शिकवण आम्ही कायम ठेवली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवार