शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

शेरीनाल्याचे दृष्टचक्र थांबणार तरी कधी?, राजकीय उदासीनतेमुळे सांगलीकरांच्या वाट्याला दूषित पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:28 IST

शेरीनाला योजनेवर २० कोटीहून अधिक रक्कम खर्च होऊनही तो कायमस्वरूपी निकाली निघालेला नाही. कृष्णा नदीचे प्रदूषण थांबलेले नाही. हे दृष्टचक्र थांबणार तरी कधी?

शीतल पाटीलसांगली : महापालिकेच्या राजकीय पटलावर पुन्हा शेरीनाल्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. शेरीनाला योजनेवर २० कोटीहून अधिक रक्कम खर्च होऊनही तो कायमस्वरूपी निकाली निघालेला नाही. कृष्णा नदीचे प्रदूषण थांबलेले नाही. हे दृष्टचक्र थांबणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.कुपवाडच्या सावळी हद्दीपासून वाहणाऱ्या नाल्यातून दररोज शेकडो लीटर सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत होते. राष्ट्रीय नदी कृृती योजनेंतर्गत शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला. सुरुवातीला २२ कोटीचा खर्च होता. कृष्णाकाठावर शेरीनाला अडवून पंपिंगद्वारे ते धुळगावपर्यंत नेणे व तेथे ऑक्सिडेशन पौंडमध्ये ते शुद्ध करून शेतीला पाणी देण्याची ही योजना होती.शेरीनाल्यावरील पंपगृह, कवलापूर येथील पंपगृह, धुळगावपर्यंतची १८ किलोमीटरची वाहिनी, धुळगाव येथे ऑक्सिडेशन पौंड ही कामे पूर्ण झाली. तरीही कृष्णा नदीचे प्रदूषण थांबलेले नाही. शेरीनाल्यावर पंप बंद असतात, अथवा त्यात बिघाड झालेला असतो. त्यामुळे सांडपाणी थेट नदीत मिसळते. धुळगाव येथे शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. प्रकल्पातील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यासाठी जवळपास १५ कोटीपेक्षा अधिकचा निधीची गरज आहे. शासनाने निधीचा टेकू दिला तरच हा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो.कोल्हापूर रोड पंपिंग स्टेशन, जेजे मारुती नाला, सांगलीवाडी नाला व शेरीनाला या चार ठिकाणचे सांडपाणी धुळगावला उचलण्याचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी सध्या केवळ शेरीनाल्याचेच पाणी उचलले जाते. कोल्हापूर रोडचे सांडपाणी नवीन ड्रेनेज योजनेकडे वळविले आहे. सांगलीवाडी व जेजे मारुती नाल्याचे पाणी शेरीनाल्यापर्यंत आणण्यासाठी ४ कोटी २८ लाख रुपयांची गरज आहे.त्यात आता थोडा जरी पाऊस झाला तरी शेरीनाल्याचे पाणी थेट नदीपात्रात जात आहे. परिणामी नागरिकांच्या वाट्याला दूषित पाणी येत आहे. आता शेरीनाल्यावर शुद्धीकरण यंत्रणा उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्यासाठी कोट्यवधीचा निधीची आवश्यकता आहे. महापालिकेने तातडीने शुद्धीकरण प्रकल्प हाती घेऊन सांगलीकरांची दूषित पाण्याच्या दृष्टचक्रातून सुटका करण्याच्यादृष्टीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.

कोट्यवधीचा दंडप्रदूषण नियंत्रण महामंडळाने दूषित पाण्यापोटी महापालिकेला दररोज दीड लाखाचा दंड केला जात आहे. दंडाचा आकडा पाहता या निधीतून शुद्धीकरण प्रकल्प उभा राहिला असता. पण त्यादृष्टीने विचार करण्याची मानसिकता ना पदाधिकाऱ्यांची आहे ना अधिकाऱ्यांची.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीpollutionप्रदूषण