शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेने अतिवृष्टीची मदत मिळणार कधी?; सांगली जिल्ह्यातील ११०२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:00 IST

२७५९१ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

सांगली : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ११ हजार २६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण, जिल्ह्यातील २७ हजार ५९१ शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाली नाही. हे सर्व शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस सुरूच असून ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहत आहेत. जुलै महिन्यातील अतिवृष्टी, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांमध्ये भाजीपाला, पपई, सोयाबीन, भुईमूग, भात, हळद, मका, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांचे सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी १० कोटी ९० लाख रुपयांच्या निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. पण, शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पुन्हा ४१३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसानऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार ५४४ शेतकऱ्यांचे चार हजार १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये फळपिक, ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वीचीच मदत मिळाली नसताना पुन्हा कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीCode of conductआचारसंहिताfundsनिधी