शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 8:28 PM

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

ठळक मुद्देकडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

सांगली : गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेला मान्सूनचा परतीचा पाऊस आणि त्यानंतरच्या अवकाळीमुळे शेतकºयांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक पाण्यात वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी, अजूनही क्षेत्रात वाढच होत असल्याने पंचनामे पूर्ण होऊन भरपाईची कार्यवाही होणार तरी कधी, असा सवाल शेतक-यांना पडला आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

प्रशासनाच्यावतीने ७ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पातळीवरून त्या आशयाच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, बाधित क्षेत्रामध्ये वाढच होत असल्याने कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांना पंचनामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तासगाव तालुक्यातील २५ हजार ९७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असून ९ हजार ७ हेक्टरवरील पंचनामे अद्यापही होणार आहेत. आटपाडीत २४२९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर अद्यापही काही क्षेत्रातील पंचनामे पूर्ण नाहीत. खानापूर तालुक्यातील ५ हजार ५५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असले तरी, ३ हजार ४६९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. यासह कडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारfloodपूर