शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:29 IST

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

ठळक मुद्देकडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

सांगली : गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेला मान्सूनचा परतीचा पाऊस आणि त्यानंतरच्या अवकाळीमुळे शेतकºयांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक पाण्यात वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी, अजूनही क्षेत्रात वाढच होत असल्याने पंचनामे पूर्ण होऊन भरपाईची कार्यवाही होणार तरी कधी, असा सवाल शेतक-यांना पडला आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

प्रशासनाच्यावतीने ७ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पातळीवरून त्या आशयाच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, बाधित क्षेत्रामध्ये वाढच होत असल्याने कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांना पंचनामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तासगाव तालुक्यातील २५ हजार ९७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असून ९ हजार ७ हेक्टरवरील पंचनामे अद्यापही होणार आहेत. आटपाडीत २४२९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर अद्यापही काही क्षेत्रातील पंचनामे पूर्ण नाहीत. खानापूर तालुक्यातील ५ हजार ५५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असले तरी, ३ हजार ४६९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. यासह कडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकारfloodपूर