शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

खोके देणाऱ्या घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीसांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:19 IST

साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती संस्कृती विचारात घेणे गरजेचे

सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने खोक्याची संस्कृती जन्माला आली आहे. खोके देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती?, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला.सांगलीवाडी येथील ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून भारती विद्यापीठाच्या शालेय समिती अध्यक्षा विजयमाला कदम, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, ज्येष्ठ कवी प्रदीप पाटील, वसंत पाटील, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, विकत घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही राजकीय संस्कृती नसते. आज पक्षीय राजकारणात उघडपणे जनता विकली जात आहे. ज्या प्रतिनिधींना जनतेने निवडून दिले आहे, तेदेखील आज उघडपणे विकले जात आहेत. हे प्रतिनिधी खोक्यांनी विकले किंवा विकत घेतले जात असतील, ही कसली राजकीय संस्कृती आज आपण पाहत आहोत?, आज विकत घेणाऱ्यांना आणि विकत देणाऱ्यालाही संस्कृती नसते.जाती-धर्माच्या नावाखाली सत्तेचा उपभोग घेण्यात राजकारणी व्यस्त असून, सध्याचे राजकारण अशुद्ध झाले आहे. शुद्ध राजकारणासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या राजकारणाची गरज आहे. लोकांच्या मनात जाती-धर्माचे विष कालवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी समाजामध्ये सांस्कृतिक संवादाची गरज आहे. माणसाचे बंधुतेत रूपांतर करण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे. धर्म ही शुद्ध कल्पना आहे. मुक्तीची कल्पना आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती होय. चांगुलपणाची विभागणी करून चालत नाही. साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती संस्कृती विचारात घेणे गरजेचे आहे.हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लीम, जैन आदी धर्मातील संस्कृती आणि विश्वात्मकता विचारात घेतली पाहिजे. महात्मा गांधी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांच्या विचारांची बेरीज करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणShripal Sabnisश्रीपाल सबनीस