शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

टेंभू सुधारित योजनेमुळे ४१ हजार ००३ हेक्टर क्षेत्राला पाणी; सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांना फायदा

By अशोक डोंबाळे | Updated: December 16, 2023 16:40 IST

अशोक डोंबाळे सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सात हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने हिवाळी अधिवेशनावेळी ...

अशोक डोंबाळेसांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सात हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. तसेच, टेंभूला पूर्वी २२ टीएमसी पाणी मिळत होते. त्यामध्ये नव्या मान्यतेने ८ टीएमसी पाण्याची भर पडणार आहे.टेंभू योजनेमध्ये सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर शेतीला पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार मुख्य कालव्यासह वितरण व्यवस्थेची कामे झाली आहेत. या कामावर आजअखेर तीन हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच चार हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित खर्चास शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली होती. या योजनेच्या लाभापासून सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुका वंचित राहिले होते. तसेच योजनेत सहभागी तालुक्यांतीलही काही गावे वंचित राहिली होती.

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर व सुमनताई पाटील यांनी शासनाकडे रेटा लावला. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील १०९ वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील १८, खटाव तालुक्यातील २८, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील १५, तासगाव १३, आटपाडी १३, कवठेमहांकाळ ८, जत ४ आणि सांगोला तालुक्यातील १० गावांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे या आठ तालुक्यांतील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने अतिरिक्त ८ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.नव्याने सिंचनाखाली येणारे क्षेत्रतालुका  - गावे  - सिंचन क्षेत्र (हेक्टर) - पाणी वापरमाण -  १८ - ५६-  ८६ - १ टीएमसीखटाव - २८ - ७४- ४० - १.५ टीएमसीखानापूर - १५ - ६४- ७१ - १.५ टीएमसीतासगाव - १३ - ६० - २६ - १ टीएमसीआटपाडी - १३ - ५२ - ९४ - १ टीएमसीकवठेमहांकाळ - ८ - ४२- ५५ - ०.५ टीएमसीजत   - ४ - २६ - ३६ - ०.५ टीएमसीसांगोला - १० - ३१ - ९५ - १ टीएमसीएकूण  -  १०९ - ४१००३  - ८ टीएमसी

जिल्ह्यातील या गावांचा नव्याने समावेशखानापूर तालुका : भिकवडी (बु.), करंजे, रेणावी, रेवणगांव, भडकेवाडी, घाेटी (बु.), घोटी (खु.), धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखीनवाडी, जाधववाडी, घाडगेवाडी, बानुरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी,तासगाव तालुका : वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, दहिवडी, कचरेवाडी, किंदरवाडी, नरसेवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, सावळज, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडीकवठेमहांकाळ : गर्जेवाडी, कुंडलापूर, रायवाडी, केरेवाडी, शेळकेवाडी, जाखापूर, जायगव्हाण, लोणारवाडी, आटपाडी : आंबेवाडी, बोंबेवाडी, राजेवाडी, काळेवाडी, खाजोडवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पांढरेवाडी, पिंपरी (खु.), पुजारवाडी (दिघंची), विभूतवाडी, गुळेवाडी, पडळकरवाडी जत : बेवनूर, नवाळवाडी, वाळेखिंडी, सिंगणहळ्ळी.

टेंभू योजनेच्या सात हजार ३७०.३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे टेंभू योजनेत सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांतील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेत. निधीला मंजुरी मिळाल्यामुळे तत्काळ कामे सुरू करून वंचित गावांमधील शेतीला पाणी देण्यात येणार आहे. -चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीSatara areaसातारा परिसरSolapurसोलापूर