शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अलमट्टी धरणात धोरण निश्चितीपेक्षा जास्त पाणीसाठा, पातळी कमी करण्याची महाराष्ट्राची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:01 IST

महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या पूर नियंत्रण बैठकीमध्ये अलमट्टी धरणातील पाणी पातळीबाबत धोरण निश्चित झाले होते

सांगली : महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या पूर नियंत्रण बैठकीमध्ये अलमट्टी धरणामध्ये जुलैत ५१७.५० मीटर पाणी पातळी ठेवण्याचे धोरण निश्चित झाले होते, तरीही २९ जुलैरोजी अलमट्टीत एक मीटरने जास्त म्हणजे ५१८.५० मीटर पातळी आहे. ती कमी करण्याची विनंती महाराष्ट्र शासनाने कर्नाटक जलसंपदा विभागाच्यास केली आहे. त्यानुसार त्यांनी ती कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अलमट्टीत जुलै महिन्यात ५१७.५० मीटरपेक्षा जास्त पाणी पातळी असू नये, असे ठरले होते. २९ जुलैरोजी ५१८.५० मीटर पाणी पातळी असून, धरणात ८५.४५ टक्के पाणीसाठा आहे. आजही कृष्णा खोऱ्यातील धरण क्षेत्रातील अतिवृष्टी होण्याचा धोका संपलेला नाही. १५ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणात ५१७.५० मीटरपेक्षा जास्त पाणीपातळी ठेवू नये, अशी विनंती महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाने अलमट्टी धरण व्यवस्थापनाकडे केली आहे.त्यानुसार अलमट्टी येथील अधिकाऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन हळूहळू धरणातील पाणी पातळी कमी करून ५१८ पर्यंत ठेवण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राच्या जलसंपदा अधिकाऱ्यांना दिले आहे.

कोयनेतील सध्या पाणीसाठा योग्यच : नितीश पोतदारधरणक्षेत्रातील ३० वर्षांच्या पावसाचा अभ्यास करून कुठल्या महिन्यात किती पाणी सोडायचे, याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर जलसंपदा आणि केंद्रीय जल आयोगाची मंजुरी घेतली जाते. धरणातील पाणी साठ्याचे जून ते १५ ऑक्टोबरपर्यंतचे नियोजन केले असून, या नियमांचे कोयना धरणात तंतोतंत पालन केले आहे. यामुळे पुरापासून तर संरक्षण करता आलेच, शिवाय वीज निर्मितीसाठीही फायदा झाला आहे. सध्याचा कोयना धरणातील पाणीसाठा योग्य आहे, अशी माहिती कोयना धरण क्षेत्राचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी दिली.

कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमचा संपर्क झाला आहे. तेथील अधिकाऱ्यांना अलमट्टी धरणामध्ये ५१८.५० मीटर पाणीपातळी ठेवली आहे. सध्याची पाणीपातळी एक मीटरने जास्त असल्यामुळे ५१७.५० मीटरच ठेवावी, अशी सूचना केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना मान्य केली असून, त्यांनी विसर्ग वाढवून पाणी पातळी कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. -मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, सांगली जलसंपदा विभाग.

धरणातील पाणीसाठाधरण - क्षमता - सध्याचा साठा - टक्केवारीअलमट्टी - १२३.०८ - १०५.१२० - ८५.४५कोयना - १०५.२५ - ६४.८३ - ६२वारणा - ३४.४० - २६.९३ - ७९

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र