शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सांगलीत पाण्याची उधळण, जतला थेंबासाठी वणवण; यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:30 IST

Water Crisis News: मार्चनंतर टँकरची मागणी वाढणार

विठ्ठल ऐनापुरेजत : जत तालुक्यातील साठवण तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे जत तालुक्यात पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवू लागली आहे. बहुतांशी गावांच्या पाणी योजना साठवण तलावावर अवलंबून आहेत. त्यामुळे मार्चनंतर जत तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एकीकडे जतमध्ये पाण्यासाठी वणवण सुरु असताना सांगलीत रंगपंचमीला पाण्याची मूक्त उधळण करण्यात आली.गतवर्षी पावसाने सरासरी गाठली तरीही तलावांमध्ये अपेक्षित पाणीसाठा मात्र झाला नाही. संखच्या मध्यम प्रकल्पासह नऊ तलावांतील पाणीसाठा तळाला गेला आहे. परिणामी, यंदाही पाणीटंचाई अटळ आहे. सोळा तलावांत म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्याने पश्चिम भागात मात्र सध्या टंचाई नाही. पूर्व भागात टंचाईचे सावट गडद होत आहे. जत पश्चिम भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आल्याने गेल्या दोन वर्षांपासून टंचाई जाणवत नाही. डफळापूर, मिरवाड या गावांना जानेवारीपासूनच टँकर द्यावा लागत होता. म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे या गावांना टँकर बंद झाले आहेत.

तीस गावांत पाणीटंचाईसंख तलावावर अवलंबित वीस ते तीस गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. उमराणी, खोजानवाडी, गुगवाड, सिद्धनाथ, जातीहाळ, तिकोडी (क्र. एक), दरीबडची व अंकलगी त्यांनी तळ गाठला आहे. या भागात शेती, जनावरे व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे. अद्याप टँकरची मागणी मात्र झालेली नाही. सद्यपरिस्थिती पाहता, मार्चनंतर जत पूर्व भागात टंचाई बाबत उपाययोजना कराव्या लागतील.

२६ हजार ५०० हेक्टर सिंचनाखाली येणारविस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६५ गावांतील १ लाख ३ हजार ९२१ हेक्टर लाभ क्षेत्र आहे. त्यापैकी २६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या वर्षाखेर हे काम पूर्ण करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असून, योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या गावांना हवेत टँकरजत पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्पाने तळ गाठला आहे. या पाण्यावर अवलंबित सिद्धनाथ, उमराणी, खोजानवाडी, गुगवाड, जालीहाळ, तिकोडी (क्र. एक), दरीबडची या गावांकडे लक्ष हवे. अंकलगी तलावाची परिस्थितीही वेगळी नाही. शिवाय, दरीबडची, माडग्याळ, जाडरबोवलाद, उमराणी, खोजानवाडी, मुचंडी, दरिकोनूर यांसह आजूबाजूच्या भागातून ही टँकरची मागणी होत आहे. दक्षिण भागातील बसरगी, गुगवाड, निगडी खुर्द या गावांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटdroughtदुष्काळWaterपाणीwater shortageपाणीकपात