शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

भारती रुग्णालयाच्या दूरदृष्टीमुळे कोरोना रुग्णांचा श्वास अखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाभरात हाहाकार उडाला आहे; पण येथील भारती रुग्णालय मात्र स्वयंपूर्णतेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाभरात हाहाकार उडाला आहे; पण येथील भारती रुग्णालय मात्र स्वयंपूर्णतेच्या जोरावर रुग्णांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरले आहे. १९ हजार लिटर क्षमतेच्या स्वतंत्र ऑक्सिजन प्रकल्पामुळे १५० खाटांच्या कोविड रुग्णालयाला अखंड ऑक्सिजन पुरवठा सुरू आहे.

रुग्णालय व्यवस्थापनाची दूरदृष्टी, सुव्यवस्थित नियोजन आणि भविष्यकालीन काटेकोर नियोजनामुळे टंचाईच्या संकटकाळातही रुग्णालयाने कोरोनाबाधितांचे श्वास अखंड राखले आहेत. रुग्णालयाकडे गेल्या वर्षापर्यंत सहा हजार लिटरचा ऑक्सिजन टँक आणि ५० जम्बो सिलिंडर इतकीच क्षमता होती. माफक शुल्कातील उपचारांमुळे रुग्णांचा ओढा प्रचंड होता. त्यांच्यासाठी ही ऑक्सिजन क्षमता अपुरी ठरत होती. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याचे गांभीर्य ठळकपणे जाणवले.

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि डॉ. अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापनाने प्रकल्पाच्या विस्ताराचा दूरदृष्टीचा निर्णय घेतला आणि तातडीने अंमलातही आणला. १३ हजार लिटर क्षमतेचे द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टँक उभारले. ५० जम्बो सिलिंडर वाढवून १३० पर्यंत नेले. त्यांची प्रत्येकी क्षमता ७ हजार लिटरची आहे. त्याशिवाय कोविड रुग्णालयासाठी ३० जम्बो सिलिंडरचा शिलकी साठा ठेवला. या स्वयंपूर्णतेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई वर्षभरात कधीच जाणवली नाही.

क्षमता वाढविल्याचा फायदा रुग्णालयाने अन्य गरजू रुग्णालयांनाही दिला. जिल्ह्यात पंधरवड्यापासून ऑक्सिजनची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात तर आणीबाणीची स्थिती उद्‌भवली. अनेक रुग्णालयांत तास-दोन तासांपुरताच ऑक्सिजन उपलब्ध होता. रुग्णांचे प्राण धोक्यात होतो. अशावेळी रुग्णालयाने काही खासगी रुग्णालयांना सिलिंडर पुरविले. त्यामुळे रुग्णांचे श्वास अखंड राहिले.

चौकट

ऑक्सिजन निर्मिती सुरू करणार

भारती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शहाजी देशमुख म्हणाले की, भारती रुग्णालयाकडे साठवणुकीची मोठी क्षमता निर्माण झाली असली तरी बाहेरून होणाऱ्या पुरवठ्यावरच ती अवलंबून आहे. सध्या देशभरातच मोठी टंचाईची स्थिती आहे. हे लक्षात घेऊन व्यवस्थापनाने स्वत:चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, ४५ दिवसांत कार्यान्वित होईल. प्रत्येक मिनिटाला ५०० लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असेल. यानिमित्ताने रुग्णालय ऑक्सिजनबाबतीत १०० टक्के स्वयंपूर्ण होईल, शिवाय गरजेनुसार अन्य रुग्णालयांनाही पुरवू शकेल.