शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Sangli: मिरज विधानसभा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 16:30 IST

खाडे यांच्याविरोधात दमदार उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीपुढे आव्हान

सदानंद औंधेमिरज : आगामी विधानसभा निवडणुकीत मिरजेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच बहुजन वंचित आघाडीने मिरजेची जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला तीन लाख मते मिळाली असल्याने सांगली लोकसभा व मिरज विधानसभेसाठी वंचितचा दावा आहे. यामुळे महाविकास आघाडीची अडचण होण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज राखीव जागेवर भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. मिरजेची जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिरजेसाठी इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देत आहेत. मात्र, महाविकास आघाडीत नसतानाही शिवसेनेसोबत असलेल्या वंचित आघाडीनेही मिरज विधानसभेवर हक्क सांगितल्याने शिवसेनेचीही अडचण होणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची तीन लाख मते व मिरज विधानसभा मतदारसंघात ३० हजारांवर मते मिळवली होती. यामुळे वंचित आघाडीने सांगली लोकसभेसाठी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे व मिरज विधानसभेसाठी युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे हे उमेदवार निश्चित करून तयारी सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत येऊन मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. महिन्यापूर्वी सुजात आंबेडकर जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीत संघर्षाची चिन्हेमिरज राखीव मतदारसंघात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचितने मिरजेवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत मिरजेच्या जागेवरून संघर्षाची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांना हा पेच सुटण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिरजेत सुरेश खाडे यांनी दोनवेळा शिवसेनेसोबत व एकदा सेनेशिवाय विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. २०१९ मध्ये खाडे यांच्यासोबत शिवसेना होती, तेव्हा सर्व विरोधी पक्षांतर्फे बाळासाहेब होनमोरे एकच उमेदवार उभे होते. त्यामुळे खाडे यांचे मताधिक्य घटून ३० हजारांवर आले.

खाडेंविरोधात एकच उमेदवारभाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असताना वंचित आघाडीच्या उमेदवाराने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास आघाडीची अडचण होणार आहे. वंचितमुळे तिरंगी लढत झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे भाजप विरोधात एकच दमदार उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणmiraj-acमिरजvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा