शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

Sangli: मिरज विधानसभा लढविण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 16:30 IST

खाडे यांच्याविरोधात दमदार उमेदवार देण्याचे महाविकास आघाडीपुढे आव्हान

सदानंद औंधेमिरज : आगामी विधानसभा निवडणुकीत मिरजेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच बहुजन वंचित आघाडीने मिरजेची जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला तीन लाख मते मिळाली असल्याने सांगली लोकसभा व मिरज विधानसभेसाठी वंचितचा दावा आहे. यामुळे महाविकास आघाडीची अडचण होण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मिरज राखीव जागेवर भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. मिरजेची जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिरजेसाठी इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देत आहेत. मात्र, महाविकास आघाडीत नसतानाही शिवसेनेसोबत असलेल्या वंचित आघाडीनेही मिरज विधानसभेवर हक्क सांगितल्याने शिवसेनेचीही अडचण होणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची तीन लाख मते व मिरज विधानसभा मतदारसंघात ३० हजारांवर मते मिळवली होती. यामुळे वंचित आघाडीने सांगली लोकसभेसाठी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे व मिरज विधानसभेसाठी युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे हे उमेदवार निश्चित करून तयारी सुरु केली आहे. गेल्या आठवड्यात डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत येऊन मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली. महिन्यापूर्वी सुजात आंबेडकर जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चात सहभागी झाले होते.

महाविकास आघाडीत संघर्षाची चिन्हेमिरज राखीव मतदारसंघात दलित व मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने वंचितने मिरजेवर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत मिरजेच्या जागेवरून संघर्षाची शक्यता आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांना हा पेच सुटण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिरजेत सुरेश खाडे यांनी दोनवेळा शिवसेनेसोबत व एकदा सेनेशिवाय विजय मिळवून हॅटट्रिक साधली आहे. २०१९ मध्ये खाडे यांच्यासोबत शिवसेना होती, तेव्हा सर्व विरोधी पक्षांतर्फे बाळासाहेब होनमोरे एकच उमेदवार उभे होते. त्यामुळे खाडे यांचे मताधिक्य घटून ३० हजारांवर आले.

खाडेंविरोधात एकच उमेदवारभाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असताना वंचित आघाडीच्या उमेदवाराने स्वतंत्र निवडणूक लढविल्यास आघाडीची अडचण होणार आहे. वंचितमुळे तिरंगी लढत झाल्यास भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे भाजप विरोधात एकच दमदार उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणmiraj-acमिरजvidhan sabhaविधानसभाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा