शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:52 IST

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे

ठळक मुद्देएकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे. मात्र, साडेतीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतूनच पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एकजुटीने आंदोलन केले जाईल. त्याला सर्व पक्ष, आघाड्या, संघटना, आदींसह नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी केले.अमृत शहर योजनेतून अनुदान मिळालेल्या वारणा नळ पाणी योजनेला दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा बचाव कृती समितीचा जोरदार विरोध होत आहे. मात्र, इचलकरंजीवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गैरसमजुतीतून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी बुधवारी नगरपालिका सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत नगराध्यक्षा स्वामी बोलत होत्या. बैठकीच्या सुरुवातीला शीतल पाटील यांनी स्वागत व भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात पोवार यांनी बैठकीचा उद्देश व्यक्त केला.नगरपालिकेकडील पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विजय जगताप म्हणाले, सन १९८६ पासून इचलकरंजी शहराकरिता वारणा धरणामध्ये एक टीएमसी पाणी आरक्षित आहे. मात्र, आंदोलकांनी कोणतीही तांत्रिक माहिती न घेता निव्वळ आंधळेपणाने विरोध सुरू केला आहे. शामराव कुलकर्णी म्हणाले, वारणा नदीतून पिण्याचे पाणी मिळणे, हा हक्क आहे. सर्वांनी एकजुटीने आंदोलन उभारले पाहिजे.अ‍ॅड. जवाहरलाल छाबडा म्हणाले, वारणा नळ योजनेला होणारा विरोध राजकीय आहे. वारणा नळ योजनेबाबत झालेला गैरसमज दूर करण्यासाठी शासनाने माजी न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती नेमावी. अहमद मुजावर म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडूनच दानोळी येथील वारणा योजना मंजूर केली आहे. योजनेची जबाबदारी घेऊन प्रशासनाने ती पूर्ण करावी.जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले, इचलकरंजीकरांना पाणी दिल्यास वारणाकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते, आदींनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. अशोक स्वामी म्हणाले, इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आता वारणा नदीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निव्वळ गैरसमज निर्माण करून पिण्याचे पाणी थांबविता येणार नाही. ततत्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून पाणी मिळण्याकरिता आंदोलन हाती घेण्यात यावे.बैठकीत विठ्ठल चोपडे, अजित जाधव, प्रकाश मोरबाळे, अशोक जांभळे, विनायक कलढोणे, अभिजित पटवा, राजन मुठाणे, बजरंग लोणारी, शिवाजी साळुंखे, बाबा नलगे, नितीन लायकर, मिश्रीलाल जाजू, गजानन महाजन, राहुल खंजिरे, नितीन कोकणे, आदींनी आपले विचार मांडले.वारणा धरण प्रकल्पामुळे नदीत मुबलक पाणीवारणा धरण प्रकल्पात नेहमीच ३४.५ टीएमसी पाणी साठविले जाते. त्यापैकी ७.५ टीएमसी पाणी विनावापर पडून राहते. सन २०१६ मध्ये मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे नदीकाठावरील गावांसाठी पाणी उपसा बंद करण्यात आला होता, असे सांगून नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले, हा अपवाद वगळता गेल्या ३०-३५ वर्षांत एकवेळ सुद्धा पाणी उपसा बंद करण्यात आला नाही. इतके मुबलक पाणी वारणा नदीतून मिळते. त्यामुळे इचलकरंजीला पाणी दिल्यास वारणा नदीमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा करण्यात आलेला गैरसमज अत्यंत चुकीचा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी