शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

वारणा योजनेसाठी एकजुटीने आंदोलन : नगराध्यक्षा अलका स्वामी यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:52 IST

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे

ठळक मुद्देएकजुटीने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

इचलकरंजी : वारणा नळ योजनेचे काम सुरू करण्यासाठी यापूर्वी आमदार ते पालकमंत्री आणि तहसीलदार ते जिल्हाधिकारी पातळीवर अनेक बैठका होऊनही वारणा बचाव कृती समितीचा विरोध कायम आहे. मात्र, साडेतीन लाख लोकसंख्येच्या इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतूनच पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एकजुटीने आंदोलन केले जाईल. त्याला सर्व पक्ष, आघाड्या, संघटना, आदींसह नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी केले.अमृत शहर योजनेतून अनुदान मिळालेल्या वारणा नळ पाणी योजनेला दानोळी (ता. शिरोळ) येथून वारणा बचाव कृती समितीचा जोरदार विरोध होत आहे. मात्र, इचलकरंजीवासीयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गैरसमजुतीतून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी बुधवारी नगरपालिका सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत नगराध्यक्षा स्वामी बोलत होत्या. बैठकीच्या सुरुवातीला शीतल पाटील यांनी स्वागत व भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात पोवार यांनी बैठकीचा उद्देश व्यक्त केला.नगरपालिकेकडील पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विजय जगताप म्हणाले, सन १९८६ पासून इचलकरंजी शहराकरिता वारणा धरणामध्ये एक टीएमसी पाणी आरक्षित आहे. मात्र, आंदोलकांनी कोणतीही तांत्रिक माहिती न घेता निव्वळ आंधळेपणाने विरोध सुरू केला आहे. शामराव कुलकर्णी म्हणाले, वारणा नदीतून पिण्याचे पाणी मिळणे, हा हक्क आहे. सर्वांनी एकजुटीने आंदोलन उभारले पाहिजे.अ‍ॅड. जवाहरलाल छाबडा म्हणाले, वारणा नळ योजनेला होणारा विरोध राजकीय आहे. वारणा नळ योजनेबाबत झालेला गैरसमज दूर करण्यासाठी शासनाने माजी न्यायाधीशांची एक सदस्यीय समिती नेमावी. अहमद मुजावर म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडूनच दानोळी येथील वारणा योजना मंजूर केली आहे. योजनेची जबाबदारी घेऊन प्रशासनाने ती पूर्ण करावी.जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले, इचलकरंजीकरांना पाणी दिल्यास वारणाकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते, आदींनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. अशोक स्वामी म्हणाले, इचलकरंजीकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आता वारणा नदीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निव्वळ गैरसमज निर्माण करून पिण्याचे पाणी थांबविता येणार नाही. ततत्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून पाणी मिळण्याकरिता आंदोलन हाती घेण्यात यावे.बैठकीत विठ्ठल चोपडे, अजित जाधव, प्रकाश मोरबाळे, अशोक जांभळे, विनायक कलढोणे, अभिजित पटवा, राजन मुठाणे, बजरंग लोणारी, शिवाजी साळुंखे, बाबा नलगे, नितीन लायकर, मिश्रीलाल जाजू, गजानन महाजन, राहुल खंजिरे, नितीन कोकणे, आदींनी आपले विचार मांडले.वारणा धरण प्रकल्पामुळे नदीत मुबलक पाणीवारणा धरण प्रकल्पात नेहमीच ३४.५ टीएमसी पाणी साठविले जाते. त्यापैकी ७.५ टीएमसी पाणी विनावापर पडून राहते. सन २०१६ मध्ये मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे नदीकाठावरील गावांसाठी पाणी उपसा बंद करण्यात आला होता, असे सांगून नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले, हा अपवाद वगळता गेल्या ३०-३५ वर्षांत एकवेळ सुद्धा पाणी उपसा बंद करण्यात आला नाही. इतके मुबलक पाणी वारणा नदीतून मिळते. त्यामुळे इचलकरंजीला पाणी दिल्यास वारणा नदीमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल, असा करण्यात आलेला गैरसमज अत्यंत चुकीचा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी