शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय; संजय राऊतांनी टीका

By संतोष भिसे | Updated: March 3, 2023 19:33 IST

सांगलीत शुक्रवारी भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.

सांगली: शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय. त्याच्या हातावर मेरा बाप चोर है असं लिहिलं होतं. तसं या ४० चोरांच्या आई, बाप, मुले, बहिण यांच्या कपाळावर गद्दार है असं लिहिलंय असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. सांगलीत शुक्रवारी भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, बजरंग पवार, हाजी सय्यद, लक्ष्मण हाक्के, अभिजित पाटील, दिगंबर जाधव, सुनिता पवार, सुजाता इंगळे, मयुर घोडके, चंद्रकांत मैगुरे, विशालसिंग रजपूत, पंडितराव बोराडे आदी उपस्थित होते. शंभूराज काटकर यांनी प्रास्ताविक केले. राऊत म्हणाले सांगली, `पन्नास खोके, एकदम ओके` ही घोषणा दोन मिनिटांत जगभरात व्हायरल झाली. जगात कोणतीही घोषणा इतकी लोकप्रिय झाली नसेल. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांविषयी असभ्य बोलणं योग्य नाही, असं मी या व्यासपीठावरुन सांगतो. पण या महाराष्ट्राच्या भावना असतील, तर माझा नाईलाज आहे. ४० जण जेथे जाताहेत, तेथे मागून व समोरुन या घोषणा दिल्या जात आहेत. हे तुम्हीच ओढवून घेतलंय.

रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांनी घरचं खाऊन आमदार, खासदार केले, ते ५० खोके घेऊन पळून गेले. निवडणूक आयोग मात्र शिवसेना त्यांची असे सांगतोय. शिवसेना आयोगाने निर्माण केलेली नाही. ती तुमच्या बापाने निर्माण केली काय? बाळासाहेब ठाकरे यांनी ५०-५५ वर्षांपूर्वी निर्माण केली. मराठी माणसासाठी काम करत राहिली. सामान्यातल्या सामान्य माणसाला नगरसेवकापासून खासदार, मुख्यमंत्री केलं. ही शिवसेना निवडणूक आयोगाने उचललून शिंदेेेंच्या घशात घातली, तेव्हापासून महाराष्ट्रात वणवा पेटला आहे. त्यात गद्दार खाक झाल्याशिवाय राहणार नाहीत.राऊत म्हणाले, कोल्हापुरात दोन खासदार, एक आमदार आणि आणखी एक अर्धा असे साडेतीन दीडशहाणे सोडून गेले. त्यांनी परत निवडून येऊन दाखवावे.

सांगली, मिरजेत पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात, मिरजेत रस्ते नाहीत. पंधरा वर्षे शिवसेनेच्या मदतीने आमदार झाले, पण रस्तेही करु शकले नाहीत. महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी खोक्याच्याही वर घेतलेत. टक्केवारीसाठी गॅंगवार करत आहेत. शिवसेनेतून सगळे ओरबडणारे निघून गेले आहेत. हे आऊटडेटेड सरकार सरकार आहे. सोळा आमदार सर्वोच्च न्यायालयात अपात्र ठरतील. पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम भाजप करत आहे. आमचे भांडण ४० चोरांशी नाही. त्यांना आम्ही गाडू शकतो. आमचं भांडण भाजपशी आहे. या पक्षाला खांद्यावर घेऊन मिरवलं. त्याच खांद्यावर अंत्ययात्रा काढू. कसब्याचा हम सब एक है हा पॅटर्न कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह एकत्र राहील. तेथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस एकत्र होते. पोलिसांच्या गाडीतूनच पैसा वाटला जात होता. तरीही भाजपचा दारुण पराभव झाला.

राऊत म्हणाले, कोरोनाकाळात हाहाकार माजला होता. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये मृतदेह वाहत होते. स्मशानाबाहेर रांगा होत्या. देशाची लाज गेली, पण उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा कुटुंबप्रमुख म्हणून प्राण वाचवले. ते आजारी पडल्याचा गैरफायदा घेऊन भाजपने शिंदेंना हाताशी धरुन सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले. शिवसेनेत शिंदेना पदे, सत्ता दिली, तरीही ठाकरे आजारी असताना कारस्थान करत होते. अशी निर्घृण माणसे सत्तेवर आहेत. त्याचा बदला, सूड महाराष्ट्राने घेतला पाहिजे. तुमची झुंडशाही मोडून काढण्यासाठी आमची गुंडशाहीच पाहिजे. निवडणूक हरतोय असे वाटले हिंदू- मुस्लिम, भारत- पाकिस्तानचे मुद्दे उचलले जातात. त्यापेक्षा भारत- चीन सुरु करा. चीनने अख्खं लडाख घेतलंय. त्याबद्दल मोदी बोलत नाहीत. काश्मिरमध्ये पंडितांच्या रोज हत्या होताहेत, त्याबद्दल मोदी बोलत नाहीत. ही कसली मन की बात? पण अंदर की बात २०२४ ला कळेल.

चंद्रकांत पाटील कोथरुडला उभे राहणार का?

दरम्यान, पत्रकार बैठकीत राऊत म्हणाले, पुण्याची हवा पालटल्याचे कसब्याच्या निकालाने दाखवून दिले आहे. आता चंद्रकांत पाटील पुन्हा कोथरुडमध्ये उभा राहणार का? कसब्यामध्ये शिवसेनेच्या ३५ ते ४० हजार मतांच्या जोरावर भाजपचा उमेदवार निवडून यायचा. हा बालेकिल्ला आता ढासळला आहे. राहुल गांधींसह माझे व अनेक मोठ्या नेत्यांचे फोन फडणवीस सरकारने टॅप केले. गुन्हेगारी कृत्य केले. ते करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला आजच पदोन्नती मिळाली. माझ्याबद्दल हक्कभंगाची तक्रार करणाऱ्यालाच चौकशी समितीचा सदस्य म्हणून घेतले. याविषयी शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. ही समिती न्याय कसा देऊ शकेल? विधीमंडळाला मी चोर म्हंटलेले नाही. ४० गद्दारांपुरता उल्लेख केला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSangliसांगलीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार