शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

Sangli: चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली, कोल्हापूरचे तिघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:46 IST

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच ...

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकजण गंभीर जखमी झाला.सूर्यकांत दगडू जाधव (वय ५२), गौरी विनायक जाधव (३५) व युवराज विजय जाधव (३२, सर्व रा. हेड पोस्ट ऑफिस, रमणमळा, कोल्हापूर), अशी अपघातातमृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर प्रशांत पांडुरंग चिले (४०, रामानंदनगर, कोल्हापूर) हे गंभीर जखमी आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.कवठेमहांकाळ पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथील जाधव कुटुंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला चारचाकी गाडीतून (एमएच ०९ जीएफ ८३२३) येत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत आले असताना चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार आदळले.यामध्ये जाधव कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृत्यू झालेल्यांचे कवठेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते.

शिरढोण येथे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस व कवठेमहांकाळ पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमीला तत्काळ मिरज येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.रमणमळा, रामानंदनगरवर शोककळाकोल्हापुरातील रमणमळा येथील सूर्यकांत जाधव हे हॉटेल व्यावसायिक होते. राजारामपुरी येथील अन्नपूर्णा हॉटेल ते स्वत: चालवत होते, तर कोगनोळी टोलनाका येथील हॉटेल त्यांनी मुलाकडे सोपवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. रामानंदनगर येथील युवराज जाधव हे सराफ व्यावसायिक होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पाचगावमध्ये नवीन बंगला खरेदी केला. गौरी विनायक जाधव या चुलत बहिणीला सोबत घेऊन ते सूर्यकांत जाधव आणि प्रशांत चिले यांच्यासोबत रविवारी सायंकाळी पंढरपूरला गेले होते. चिले हे गंभीर जखमी असून, ते खासगी कंपनीत काम करतात. सूर्यकांत जाधव, युवराज जाधव आणि गौरी जाधव यांच्या अपघाती मृत्यूमुळे रमणमळा आणि रामानंदनगर परिसरात शोककळा पसरली.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर