शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Sangli: चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली, कोल्हापूरचे तिघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:46 IST

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच ...

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकजण गंभीर जखमी झाला.सूर्यकांत दगडू जाधव (वय ५२), गौरी विनायक जाधव (३५) व युवराज विजय जाधव (३२, सर्व रा. हेड पोस्ट ऑफिस, रमणमळा, कोल्हापूर), अशी अपघातातमृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर प्रशांत पांडुरंग चिले (४०, रामानंदनगर, कोल्हापूर) हे गंभीर जखमी आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.कवठेमहांकाळ पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथील जाधव कुटुंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला चारचाकी गाडीतून (एमएच ०९ जीएफ ८३२३) येत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत आले असताना चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार आदळले.यामध्ये जाधव कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृत्यू झालेल्यांचे कवठेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते.

शिरढोण येथे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस व कवठेमहांकाळ पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमीला तत्काळ मिरज येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.रमणमळा, रामानंदनगरवर शोककळाकोल्हापुरातील रमणमळा येथील सूर्यकांत जाधव हे हॉटेल व्यावसायिक होते. राजारामपुरी येथील अन्नपूर्णा हॉटेल ते स्वत: चालवत होते, तर कोगनोळी टोलनाका येथील हॉटेल त्यांनी मुलाकडे सोपवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. रामानंदनगर येथील युवराज जाधव हे सराफ व्यावसायिक होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पाचगावमध्ये नवीन बंगला खरेदी केला. गौरी विनायक जाधव या चुलत बहिणीला सोबत घेऊन ते सूर्यकांत जाधव आणि प्रशांत चिले यांच्यासोबत रविवारी सायंकाळी पंढरपूरला गेले होते. चिले हे गंभीर जखमी असून, ते खासगी कंपनीत काम करतात. सूर्यकांत जाधव, युवराज जाधव आणि गौरी जाधव यांच्या अपघाती मृत्यूमुळे रमणमळा आणि रामानंदनगर परिसरात शोककळा पसरली.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर