शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

Sangli: चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकली, कोल्हापूरचे तिघे जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:46 IST

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच ...

कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील उड्डाणपुलावर चारचाकी वाहन दुभाजकावर जोरदार आदळले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकजण गंभीर जखमी झाला.सूर्यकांत दगडू जाधव (वय ५२), गौरी विनायक जाधव (३५) व युवराज विजय जाधव (३२, सर्व रा. हेड पोस्ट ऑफिस, रमणमळा, कोल्हापूर), अशी अपघातातमृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर प्रशांत पांडुरंग चिले (४०, रामानंदनगर, कोल्हापूर) हे गंभीर जखमी आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला.कवठेमहांकाळ पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथील जाधव कुटुंब सूर्यकांत जाधव, गौरी जाधव, युवराज जाधव व प्रशांत चिले हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून ते कोल्हापूरला चारचाकी गाडीतून (एमएच ०९ जीएफ ८३२३) येत असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावच्या हद्दीत आले असताना चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी वाहन उड्डाणपुलावरील दुभाजकावर जाऊन जोरदार आदळले.यामध्ये जाधव कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रशांत चिले हे गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृत्यू झालेल्यांचे कवठेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते.

शिरढोण येथे झालेल्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस व कवठेमहांकाळ पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमीला तत्काळ मिरज येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.रमणमळा, रामानंदनगरवर शोककळाकोल्हापुरातील रमणमळा येथील सूर्यकांत जाधव हे हॉटेल व्यावसायिक होते. राजारामपुरी येथील अन्नपूर्णा हॉटेल ते स्वत: चालवत होते, तर कोगनोळी टोलनाका येथील हॉटेल त्यांनी मुलाकडे सोपवले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. रामानंदनगर येथील युवराज जाधव हे सराफ व्यावसायिक होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी पाचगावमध्ये नवीन बंगला खरेदी केला. गौरी विनायक जाधव या चुलत बहिणीला सोबत घेऊन ते सूर्यकांत जाधव आणि प्रशांत चिले यांच्यासोबत रविवारी सायंकाळी पंढरपूरला गेले होते. चिले हे गंभीर जखमी असून, ते खासगी कंपनीत काम करतात. सूर्यकांत जाधव, युवराज जाधव आणि गौरी जाधव यांच्या अपघाती मृत्यूमुळे रमणमळा आणि रामानंदनगर परिसरात शोककळा पसरली.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर