शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ऑफिस सुटते पाच वाजता, घरी पोहोचायला वाजतात रात्रीचे दहा; महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या लहरी वेळापत्रकामुळे नोकरदारांची ससेहोलपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:59 IST

लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाही

सांगली : कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ बदलल्याने हजारो प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रवासी वेठीस धरले गेले आहेत. प्रवाशांच्या तक्रारीला परप्रांतीय अधिकारी दाद देत नसल्याचे चित्र आहे. पाच वाजता कामावरुन सुट्टी झालेल्या नोकरदारांना रात्री साडेआठ वाजता रेल्वे मिळत आहे. परिणामी घरी पोहोचायला चक्क दहा वाजत आहेत.कोरोनापूर्वी ही एक्स्प्रेस दुपारी ३.३० वाजता कोल्हापुरातून सुटायची. मिरजेत पावणेपाच व सांगलीत पाच वाजता यायची. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, मिरजेतील हजारो नोकरदारांना घरी वेळेत पोहोचणे शक्य होते. कोरोनानंतर गाडीची वेळ बदलली असून, कोल्हापुरातून दुपारी पावणेतीन वाजता सोडली जात आहे. मिरजेत पावणेचार व सांगलीत चार वाजताच येऊ लागली आहे. त्यामुळे नोकरदारांना गाडी मिळेना झाली आहे. साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी या गाडीनंतर रात्री उशिरापर्यंत दुसरी गाडी नाही. त्यामुळे प्रवासी हैराण आहेत.वेळ पूर्ववत करावी यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरु आहे. पण, पुणे विभागातील उत्तर प्रदेश, बिहारच्या अधिकाऱ्यांना मराठी प्रवाशांच्या त्रासाची पर्वा नाही. त्यांच्या मर्जीवर गाडी धावत आहे. त्यामुळे यामध्ये प्रवासी आणि रेल्वे या दोहोंचे नुकसान होत आहे.

लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाहीपुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत ` वेळ बदलू ` असे सांगणारे अधिकारी नंतर मात्र पाठ फिरवतात. त्रस्त प्रवाशांनी खासदार संजय पाटील, धैर्यशील पाटील यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापुरातील सर्व आमदार, खासदारांना निवेदने दिली आहेत. पण, कोणीही पाठपुरावा केलेला नाही.

दुहेरीकरणानंतर पुन्हा वेळ बदलणारपुणे - मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर एक्स्प्रेस गाड्यांची गती वाढणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. परिणामी महाराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ पुन्हा बदलली जाणार आहे. अर्थात, दुहेरीकरणानंतर गाड्या वाढणार असल्याने सायंकाळच्या प्रवाशांना एखादी गाडी मिळण्याची आशा आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदलाची शक्यता कमी आहे. या गाडीला पुढे अन्य गाड्यांची कनेक्टिव्हिटी दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून वेळ बदलण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. दुहेरीकरणानंतर नवीन पॅसेंजर मागणे हाच तूर्त उपाय आहे. - सुकुमार पाटील, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे