शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

ऑफिस सुटते पाच वाजता, घरी पोहोचायला वाजतात रात्रीचे दहा; महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या लहरी वेळापत्रकामुळे नोकरदारांची ससेहोलपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:59 IST

लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाही

सांगली : कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ बदलल्याने हजारो प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रवासी वेठीस धरले गेले आहेत. प्रवाशांच्या तक्रारीला परप्रांतीय अधिकारी दाद देत नसल्याचे चित्र आहे. पाच वाजता कामावरुन सुट्टी झालेल्या नोकरदारांना रात्री साडेआठ वाजता रेल्वे मिळत आहे. परिणामी घरी पोहोचायला चक्क दहा वाजत आहेत.कोरोनापूर्वी ही एक्स्प्रेस दुपारी ३.३० वाजता कोल्हापुरातून सुटायची. मिरजेत पावणेपाच व सांगलीत पाच वाजता यायची. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, मिरजेतील हजारो नोकरदारांना घरी वेळेत पोहोचणे शक्य होते. कोरोनानंतर गाडीची वेळ बदलली असून, कोल्हापुरातून दुपारी पावणेतीन वाजता सोडली जात आहे. मिरजेत पावणेचार व सांगलीत चार वाजताच येऊ लागली आहे. त्यामुळे नोकरदारांना गाडी मिळेना झाली आहे. साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी या गाडीनंतर रात्री उशिरापर्यंत दुसरी गाडी नाही. त्यामुळे प्रवासी हैराण आहेत.वेळ पूर्ववत करावी यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा सुरु आहे. पण, पुणे विभागातील उत्तर प्रदेश, बिहारच्या अधिकाऱ्यांना मराठी प्रवाशांच्या त्रासाची पर्वा नाही. त्यांच्या मर्जीवर गाडी धावत आहे. त्यामुळे यामध्ये प्रवासी आणि रेल्वे या दोहोंचे नुकसान होत आहे.

लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाहीपुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत ` वेळ बदलू ` असे सांगणारे अधिकारी नंतर मात्र पाठ फिरवतात. त्रस्त प्रवाशांनी खासदार संजय पाटील, धैर्यशील पाटील यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापुरातील सर्व आमदार, खासदारांना निवेदने दिली आहेत. पण, कोणीही पाठपुरावा केलेला नाही.

दुहेरीकरणानंतर पुन्हा वेळ बदलणारपुणे - मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर एक्स्प्रेस गाड्यांची गती वाढणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. परिणामी महाराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ पुन्हा बदलली जाणार आहे. अर्थात, दुहेरीकरणानंतर गाड्या वाढणार असल्याने सायंकाळच्या प्रवाशांना एखादी गाडी मिळण्याची आशा आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदलाची शक्यता कमी आहे. या गाडीला पुढे अन्य गाड्यांची कनेक्टिव्हिटी दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून वेळ बदलण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. दुहेरीकरणानंतर नवीन पॅसेंजर मागणे हाच तूर्त उपाय आहे. - सुकुमार पाटील, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती, मध्य रेल्वे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे