शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी श्रीलंका, पाकिस्तानकडे पाहावे, अजित पवारांचा भाजपला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:22 IST

देशातले लोकही तुमच्या-माझ्यासारखी माणसेच आहेत. ज्यांनी सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला त्यांना लोक कधीही स्वीकारणार नाहीत.

सांगली : सत्तेसाठी देशात सर्वत्र सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांनी एकदा श्रीलंका, पाकिस्तानची अवस्था पाहावी, असा सल्ला रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला दिला.

सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात ते बाेलत होते. ते म्हणाले की, सत्ता येते व जाते, पण सत्तेसाठी शेकडो वर्षांची सलोख्याची परंपरा बिघडविणे योग्य नाही. समाज एकसंध राहावा म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. सत्तेच्या स्वार्थासाठी विनाकारण जाती-धर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. कोणत्याही धर्माने दुसऱ्याचा तिरस्कार शिकविला नाही. मग हे लोक कशासाठी हा प्रयत्न करताहेत? सत्ता मिळाली नाही की धार्मिक व भावनिक मुद्द्यांचे राजकारण सुरू केले जात आहे.

अशाच राजकारणातून श्रीलंका हा देश उद्ध्वस्त झाला. पाकिस्तानातही पंतप्रधानांना हटवावे लागले. या देशांशी आमचा काय संबंध, असे कोणाला वाटत असेल तर ती मोठी चूक ठरेल. त्या देशातले लोकही तुमच्या-माझ्यासारखी माणसेच आहेत. ज्यांनी सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला त्यांना लोक कधीही स्वीकारणार नाहीत.

जैन धर्मीयांनी सर्वात आदर्श मूल्ये जपली आहेत. अहिंसेबरोबर सलोखा व शांतीचा पुरस्कार त्यांनी केला आहे. काही राजकीय लोकांसाठी या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जैन समाजाने सर्व पक्ष, प्रांत, जाती-धर्माच्या लोकांना एकाच व्यासपीठावर आणले. ही किमया त्यांच्या आदर्श तत्त्वात आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

टॅग्स :SangliसांगलीAjit Pawarअजित पवारBJPभाजपा