शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'?

By अशोक डोंबाळे | Updated: September 24, 2022 13:35 IST

ऊस दरावरून कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

अशोक डोंबाळेसांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी उसाची एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. पण, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांचे यंदाही एफआरपीचे तुकडेच करण्याचे मनसुबे दिसून येत आहेत. शेतकरी म्हणतील, तशी एफआरपी देऊ, अशी वरकरणी भूमिका त्यांनी घेतली आहे. ऊस दरावरून कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.‘जागर एफआरपीचा, संघर्ष ऊसदराचा’, हे घोषवाक्य घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांची जनजागृती यात्रा दि. २४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपीची घोषणा करून दराची कोंडी फोडली आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी ठेवलेली नाही. टप्प्याटप्प्याने एफआरपी देणेच फायदेशीर असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. दि. १५ ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद असून त्यानंतर कारखान्यांचे हंगाम सुरू होणार आहेत. त्यावेळी जिल्ह्यात ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरला जमते, ते सांगलीत का नाही? : संदीप राजोबाकोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी अडचणी कितीही आल्या तरी एकरकमी एफआरपी देणार, अशी घोषणा केली आहे. परंतु कोल्हापूरला लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र मागील वर्षापासून टप्प्याटप्प्याने एफआरपी देत आहेत. कोल्हापूरला जमत असेल तर सांगलीतील कारखानदारांनाच का जमत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी उपस्थित केला आहे.

...यंदा एकरकमीच एफआरपीयावर्षी एकरकमीच एफआरपी मिळाली पाहिजे. यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. जे कारखाने ती देणार नाहीत, तेथे संघर्ष होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कारखानदार एफआरपीचे तुकडे करण्याच्या तयारीत आहेत.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार देणार : अरुण लाड

शासनाने टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याचा कायदा केला आहे. तीन टप्प्यात दिलेल्या एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी येत आहेत. त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने एफआरपी देत आहोत. तुकडे करतो, तरीही एफआरपीपेक्षा जादा पैसे देत आहोत. आम्ही शेतकऱ्यांचे हित पाहत असून त्यामध्ये तडजोड करणार नाही. शेतकऱ्यांनीच एकरकमी एफआरपी मागितली तर तशीही देण्यात येईल, असे मत कुंडलच्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आ. अरुण लाड यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना