शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हृदयद्रावक! वाहनाने ठोकरले...जीव गेल्यावरही असंख्य गाड्यांनी मृतदेहाला चिरडले; मिरजेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:35 IST

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावरून शेकडो वाहने गेली. मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे सौजन्य कोणीही दाखविले नाही. या प्रकाराने माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिरज : निलजी-बामणी (ता. मिरज) येथे रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या अनोळखी पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जीव गेला. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पसार झाले; मात्र त्यानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावरून शेकडो वाहने गेली. अक्षरश: चिंधड्या झाल्या. मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे सौजन्य कोणीही दाखविले नाही. रविवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराने माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गावर निलजी-बामणी हद्दीत हा अपघात घडला. मृत ३५ वर्षांचा तरुण बेघर असून, निलजी परिसरात कोठेही फिरत असल्याचे सांगण्यात आले. रविवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास तो रस्त्याच्या कडेने चालत निघाला होता. यादरम्यान अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. भरधाव वाहनचालकास अपघात झाल्याचे कळले की नाही, हाही प्रश्नच;

मात्र अपघातानंतर भररस्त्यात पडलेल्या मृतदेहावरून नंतरच्या तासाभरात शेकडो वाहने गेली. कोणीही मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे अथवा मृतदेहावरून जाणाऱ्या वाहनांना अटकाव करण्याचे सौजन्य दाखविले नाही. शेकडो वाहने अंगावरून गेल्याने मृतदेहाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या.याबाबतची माहिती मिळताच पोलिसपाटील रफिक अहमद महमद इसाक पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना अपघाताविषयी कळविले. पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी धावले. मृतदेहाचे तुकडे अक्षरश: पोत्यात भरून नेण्याची वेळ पोलिसांवर आली. मनाला चटका लावणाऱ्या या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस