शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

असंवैधानिक सरकारला जनतेपक्षा 'त्या' ४० आमदारांची चिंता - विश्वजीत कदम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:12 IST

बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीच द्या

सांगली : बहुमत नसतानाही असंवैधानिक सरकार बनविण्यासाठी शिवसेनेतून फुटून ४० आमदारांनी मदत केल्याप्रकरणी त्यांचीच महायुती सरकारला जास्त चिंता आहे. म्हणून ते राज्यातील महिला व मुलींना संरक्षण देण्यात कमी पडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केला. शासनाने बदलापूर घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तात्काळ काही उपाययोजना करण्याची गरज होती. पण, या सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे, असा ढोल सत्ताधारी वाजवत आहेत. पण राज्यातील महिला आणि मुलींच्यावर अन्याय होताना, ते थांबविण्यासाठी काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. बदलापूर येथील ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या प्रशासनात कोण आहे. त्यांना वाचवण्यासाठीच सत्ताधारी प्रयत्नशील होते. त्यामुळेच जनता त्यांच्यावर चिडून आहे. दिवसेंदिवस अशा घटना घडत आहेत. पण सरकार शासकीय कार्यक्रम करण्यात मश्गूल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडतोय ती शरमेची गोष्ट

सिंधुदुर्ग येथे सहा महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पडला आहे. ही या सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे. याला जबाबदार कोण?, सहा महिन्यांत हा पुतळा पडतोय, म्हणजे या पाठीमागे काय काळेबिरे आहे? याचा तपास झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभा करण्यात येणार म्हणून गेल्या दहा वर्षांपासून सांगण्यात येत आहे. पण अद्यापही हा पुतळा उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. पण सहा महिन्यांपूर्वीच खुद्द मोदी यांनी उद्घाटन केलेला पुतळा पडतोय, याची खंतही सत्ताधाऱ्यांसह कोणालाही वाटत नाही, याचे दुःख वाटतेय, असे डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.

जळगावमध्ये २४ लोक मृत्यू झाले असतानाही मोदींची सभाजळगावमधील २४ लोक काठमांडू येथे अपघातात ठार झाले. त्यानंतरही लगेच त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे. ही सभा घेऊन त्यांनी आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिले आहे. ही सभा आठ दिवसांनी घेतली असती तरीही चालले असते. पण त्यांनी तसे न करता तात्काळ ही सभा घेतली आहे. त्यामुळे मोदी यांना जनतेविषयी किती कळवळा आहे हेच स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीbadlapurबदलापूरVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाShiv Senaशिवसेना