शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

असंवैधानिक सरकारला जनतेपक्षा 'त्या' ४० आमदारांची चिंता - विश्वजीत कदम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:12 IST

बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीच द्या

सांगली : बहुमत नसतानाही असंवैधानिक सरकार बनविण्यासाठी शिवसेनेतून फुटून ४० आमदारांनी मदत केल्याप्रकरणी त्यांचीच महायुती सरकारला जास्त चिंता आहे. म्हणून ते राज्यातील महिला व मुलींना संरक्षण देण्यात कमी पडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केला. शासनाने बदलापूर घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तात्काळ काही उपाययोजना करण्याची गरज होती. पण, या सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे, असा ढोल सत्ताधारी वाजवत आहेत. पण राज्यातील महिला आणि मुलींच्यावर अन्याय होताना, ते थांबविण्यासाठी काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. बदलापूर येथील ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या प्रशासनात कोण आहे. त्यांना वाचवण्यासाठीच सत्ताधारी प्रयत्नशील होते. त्यामुळेच जनता त्यांच्यावर चिडून आहे. दिवसेंदिवस अशा घटना घडत आहेत. पण सरकार शासकीय कार्यक्रम करण्यात मश्गूल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडतोय ती शरमेची गोष्ट

सिंधुदुर्ग येथे सहा महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पडला आहे. ही या सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे. याला जबाबदार कोण?, सहा महिन्यांत हा पुतळा पडतोय, म्हणजे या पाठीमागे काय काळेबिरे आहे? याचा तपास झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभा करण्यात येणार म्हणून गेल्या दहा वर्षांपासून सांगण्यात येत आहे. पण अद्यापही हा पुतळा उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. पण सहा महिन्यांपूर्वीच खुद्द मोदी यांनी उद्घाटन केलेला पुतळा पडतोय, याची खंतही सत्ताधाऱ्यांसह कोणालाही वाटत नाही, याचे दुःख वाटतेय, असे डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.

जळगावमध्ये २४ लोक मृत्यू झाले असतानाही मोदींची सभाजळगावमधील २४ लोक काठमांडू येथे अपघातात ठार झाले. त्यानंतरही लगेच त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे. ही सभा घेऊन त्यांनी आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिले आहे. ही सभा आठ दिवसांनी घेतली असती तरीही चालले असते. पण त्यांनी तसे न करता तात्काळ ही सभा घेतली आहे. त्यामुळे मोदी यांना जनतेविषयी किती कळवळा आहे हेच स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीbadlapurबदलापूरVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाShiv Senaशिवसेना