शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

असंवैधानिक सरकारला जनतेपक्षा 'त्या' ४० आमदारांची चिंता - विश्वजीत कदम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:12 IST

बदलापूर घटनेतील आरोपींना फाशीच द्या

सांगली : बहुमत नसतानाही असंवैधानिक सरकार बनविण्यासाठी शिवसेनेतून फुटून ४० आमदारांनी मदत केल्याप्रकरणी त्यांचीच महायुती सरकारला जास्त चिंता आहे. म्हणून ते राज्यातील महिला व मुलींना संरक्षण देण्यात कमी पडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केला. शासनाने बदलापूर घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तात्काळ काही उपाययोजना करण्याची गरज होती. पण, या सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे, असा ढोल सत्ताधारी वाजवत आहेत. पण राज्यातील महिला आणि मुलींच्यावर अन्याय होताना, ते थांबविण्यासाठी काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. बदलापूर येथील ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या प्रशासनात कोण आहे. त्यांना वाचवण्यासाठीच सत्ताधारी प्रयत्नशील होते. त्यामुळेच जनता त्यांच्यावर चिडून आहे. दिवसेंदिवस अशा घटना घडत आहेत. पण सरकार शासकीय कार्यक्रम करण्यात मश्गूल आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडतोय ती शरमेची गोष्ट

सिंधुदुर्ग येथे सहा महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पडला आहे. ही या सरकारसाठी शरमेची गोष्ट आहे. याला जबाबदार कोण?, सहा महिन्यांत हा पुतळा पडतोय, म्हणजे या पाठीमागे काय काळेबिरे आहे? याचा तपास झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात पुतळा उभा करण्यात येणार म्हणून गेल्या दहा वर्षांपासून सांगण्यात येत आहे. पण अद्यापही हा पुतळा उभा करण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. पण सहा महिन्यांपूर्वीच खुद्द मोदी यांनी उद्घाटन केलेला पुतळा पडतोय, याची खंतही सत्ताधाऱ्यांसह कोणालाही वाटत नाही, याचे दुःख वाटतेय, असे डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.

जळगावमध्ये २४ लोक मृत्यू झाले असतानाही मोदींची सभाजळगावमधील २४ लोक काठमांडू येथे अपघातात ठार झाले. त्यानंतरही लगेच त्याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे. ही सभा घेऊन त्यांनी आपण असंवेदनशील असल्याचे दाखवून दिले आहे. ही सभा आठ दिवसांनी घेतली असती तरीही चालले असते. पण त्यांनी तसे न करता तात्काळ ही सभा घेतली आहे. त्यामुळे मोदी यांना जनतेविषयी किती कळवळा आहे हेच स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही डॉ. विश्वजीत कदम यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीbadlapurबदलापूरVishwajeet Kadamविश्वजीत कदमBJPभाजपाShiv Senaशिवसेना