शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:20 IST

'भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा'

सांगली : मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीला कोणताही फटका बसणार नाही. उलट अमराठी मतांचा फायदा महायुतीलाच होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. राज ठाकरे चांगले नेते आहेत, त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, पण त्यांना मते मिळत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.मंत्री आठवले रविवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरमध्ये महायुतीचा निर्णय झाल्याचे सांगत, आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत रिपाइं एकत्र लढणार आहे. आम्ही २०१२ पासून एनडीए सोबत आहोत. एकही खासदार नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दहा वर्षे मंत्रीपद दिले आहे. भाजप छोटे पक्ष संपवितो, असा आरोप केला जातो, तो चुकीचा असून, आम्ही नागालँड, मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत पक्षाची वाढ केली आहे.मुंबई महापालिका महायुतीसाठी महत्त्वाची असून, ठाकरेंच्या हातून महापालिका हिसकावून घेण्याचे नियोजन झाले आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. रिपाइंने मुंबईत २५ जागांची तयारी केली आहे. त्यापैकी १५ ते १६ जागांची मागणी राहील, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने अमराठी मते त्यांना मिळणार नाहीत, असा दावा करीत मुंबईत ४० टक्के मराठी मते आहेत.मराठी मतात भाजप, काँग्रेस व ठाकरे यांचाही वाट असेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ठाकरे बंधू विसरले आहेत. पूर्वी शिवसेनेने गुजराती सेना, उत्तर भारतीय सेना तयार केली. मुस्लिमांच्या मतांचे पाठबळ होते. मात्र, राज ठाकरे हे सोबत आल्याने उद्धव ठाकरे यांचे नुकसान होणार आहे. लोकसभा, विधानसभेचा दाखला देत आठवले म्हणाले की, लोकसभेवेळी राज ठाकरे महायुतीसोबत होते, त्यांचा फार फायदा झाला नाही. विधानसभेवेळी ते सोबत नव्हते, तेव्हा महायुतीने चांगले यश मिळविल्याचे त्यांनी सांगितले.मतचोरीच्या आरोपाबाबत ते म्हणाले की, मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव अनेक ठिकाणी आहे. एकाच पत्त्यावर ४० हून अधिक लोकांची नावे आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदार यादीत दुरुस्ती करावी, अशी रिपाइंची भूमिका आहे. मतचोरीबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आरोप चुकीचे आहेत. तसे असेल, तर लोकसभेवेळी मतचोरी झाली होती का?, असा सवालही त्यांनी केला. मतदार यादी दुरुस्तीसाठी एसआयआरचा निर्णय आयोगाने घेतल्याचे ते म्हणाले.

सांगलीत पाच ते सहा जागा मिळाव्यातसांगली महापालिका निवडणुकीत रिपाइंला पाच ते सहा जागा मिळाव्यात, अशी मागणी राज्यमंत्री आठवले यांनी केली. सांगलीसाठी इच्छुकांची यादी तयार केली आहे. लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray brothers' unity benefits Mahayuti: Union Minister Ramdas Athawale

Web Summary : Ramdas Athawale claims Thackeray's alliance won't harm Mahayuti in Mumbai's municipal elections. Amraathi votes will benefit them. BJP, Shinde Sena, and Ajit Pawar's NCP will contest together. Mahayuti aims to win Mumbai's mayoral election.