शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

Ramdas Athawale: खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 15:34 IST

संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे.

मिरज : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे महाबंड शिवसेनेला मोठा झटका आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केली. खरी शिवसेनाएकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दावाही त्यांनी केला.

आठवले म्हणाले, काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युतीमुळे गेल्या अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३६ आमदारांनी बंड केले. महाविकास आघाडीला आता तोंड काळे करण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्तेत असतानाही सेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती, त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. केवळ भाजपवर आरोप करून सत्ता राखण्याची महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. म्हणूनच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता एकनाथ शिंदे यांनी सरकारलाच सुरुंग लावला आहे.

संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे. यामुळे आता निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून जावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जास्त आमदार असल्याने त्यांचीच खरी शिवसेना आहे. मी स्वतः देवेंद्र फडणवीस याना भेटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची विनंती करणार आहे. भाजप व मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाल्यास रिपाइंला मंत्रिपद, महामंडळ, कमिट्या देण्याची मागणी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेस राष्ट्रपती निवडणुकीसाठी संधी देऊन अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. मुर्मू या निवडणुकीत विजयी होणार, हे नक्की आहे. विरोधकांनी शरद पवार याना राष्ट्रपती निवडणुकीत उतरवून त्यांचा बळीचा बकरा करण्याचे ठरविले होते. मात्र जेथे विजयाची शक्यता नाही, तेथे पवार ते जाणार नाहीत. मुंबई महापालिकेतही यावेळी भाजप व मित्रपक्षांची सत्ता येणार असल्याचा दावाही आठवले यांनी केला. यावेळी रिपाइंचे नेते, नगरसेवक विवेक कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सद्याच्या राजकीय स्थितीवर आठवले यांनी कविता सादर केली.

राऊत, ठाकरे कंपनीचे नको ते सर्व धंदे...बंद करणारे एकनाथ शिंदेशिंदे व सहकारी सच्चे व खंदे,ते अजिबात राहिले नाहीत अंधे,म्हणून येताहेत शिंदे...

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ