शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

Ramdas Athawale: खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 15:34 IST

संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे.

मिरज : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे महाबंड शिवसेनेला मोठा झटका आहे. त्यामुळे सद्यस्थितीत राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे. भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केली. खरी शिवसेनाएकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दावाही त्यांनी केला.

आठवले म्हणाले, काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युतीमुळे गेल्या अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३६ आमदारांनी बंड केले. महाविकास आघाडीला आता तोंड काळे करण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्तेत असतानाही सेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती, त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. केवळ भाजपवर आरोप करून सत्ता राखण्याची महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. म्हणूनच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता एकनाथ शिंदे यांनी सरकारलाच सुरुंग लावला आहे.

संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे. यामुळे आता निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून जावे लागेल. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जास्त आमदार असल्याने त्यांचीच खरी शिवसेना आहे. मी स्वतः देवेंद्र फडणवीस याना भेटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची विनंती करणार आहे. भाजप व मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाल्यास रिपाइंला मंत्रिपद, महामंडळ, कमिट्या देण्याची मागणी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेस राष्ट्रपती निवडणुकीसाठी संधी देऊन अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. मुर्मू या निवडणुकीत विजयी होणार, हे नक्की आहे. विरोधकांनी शरद पवार याना राष्ट्रपती निवडणुकीत उतरवून त्यांचा बळीचा बकरा करण्याचे ठरविले होते. मात्र जेथे विजयाची शक्यता नाही, तेथे पवार ते जाणार नाहीत. मुंबई महापालिकेतही यावेळी भाजप व मित्रपक्षांची सत्ता येणार असल्याचा दावाही आठवले यांनी केला. यावेळी रिपाइंचे नेते, नगरसेवक विवेक कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सद्याच्या राजकीय स्थितीवर आठवले यांनी कविता सादर केली.

राऊत, ठाकरे कंपनीचे नको ते सर्व धंदे...बंद करणारे एकनाथ शिंदेशिंदे व सहकारी सच्चे व खंदे,ते अजिबात राहिले नाहीत अंधे,म्हणून येताहेत शिंदे...

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ