शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

‘इंडिया’चे नाव तडकाफडकी बदलू नये - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Updated: September 8, 2023 18:42 IST

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून ...

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून लगेच तडकाफडकी देशाचे नावात बदल करून ‘इंडिया’चे भारत करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही नाव बदल्यामुळे सर्व कागदपत्रांसह चलनी नोटा, नाणी बदलावी लागणार आहेत. नोटबंदीच्या त्रासातून आजही जनता सावरली नाही, तोपर्यंत नवीन त्रास जनतेला देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापना केली आहे. याला विरोध करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने ‘इंडिया’चे भारत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल राजू शेट्टी यांना भूमिका विचारली. यावेळी राजू शेट्टी सांगलीत शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारत नावाचा सर्वांना अभिमान आहेच, पण तडकाफडकी नाव बदलू नये. त्याला तांत्रिक अडचण आहे. यासाठी पैसाही प्रचंड लागेल. भारत हे अधिकृत नाव झाल्यानंतर सर्व चलनी नोटा, नाणी बदलावी लागतील. नोटबंदीचा एकदा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. सरकारला पुन्हा तो त्रास द्यायचा आहे का ? इंडिया हे नाव बदलल्यानंतर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाव बदलण्यासाठी सहमती घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, ऊस वाहतूकदार संघटनेचे संदीप राजोबा आदी उपस्थित होते.‘स्वाभिमानी’ स्वतंत्रच लढणारकेंद्र आणि राज्य सरकार हे शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. या सरकारला तीव्र विरोध करण्यात विरोधकही अपयशी ठरले आहेत. सत्ता कुणाचीही असली तरी त्यामध्ये साखर कारखानदारांची लॉबी आहेच. हे कारखानदार शेतकऱ्यांचे कधीच हित पाहणार नाहीत. म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबर न जाता राज्यात स्वाभिमानी पक्ष स्वतंत्रच लढणार आहे. मी स्वत: हातकणंगले लोकसभा आणि सांगलीसह अन्य मतदारसंघांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार निश्चित करणार आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

रविकांत तुपकर स्वाभिमानी बरोबरचबुलढाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांनीच संघटनेबरोबर असल्याचा खुलासा केला आहे. तुपकरांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. ते संघटनेत लवकरच सक्रीय सहभागी होती, असेही राजू शेट्टी म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार