शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

‘इंडिया’चे नाव तडकाफडकी बदलू नये - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Updated: September 8, 2023 18:42 IST

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून ...

सांगली : आगामी निवडणुकीत भाजपला तगडा विरोध करण्यासाठी काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापन केली आहे. या नावावरून लगेच तडकाफडकी देशाचे नावात बदल करून ‘इंडिया’चे भारत करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही नाव बदल्यामुळे सर्व कागदपत्रांसह चलनी नोटा, नाणी बदलावी लागणार आहेत. नोटबंदीच्या त्रासातून आजही जनता सावरली नाही, तोपर्यंत नवीन त्रास जनतेला देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.काँग्रेससह विविध प्रादेशिक पक्षांनी मिळून ‘इंडिया’ची स्थापना केली आहे. याला विरोध करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने ‘इंडिया’चे भारत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल राजू शेट्टी यांना भूमिका विचारली. यावेळी राजू शेट्टी सांगलीत शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारत नावाचा सर्वांना अभिमान आहेच, पण तडकाफडकी नाव बदलू नये. त्याला तांत्रिक अडचण आहे. यासाठी पैसाही प्रचंड लागेल. भारत हे अधिकृत नाव झाल्यानंतर सर्व चलनी नोटा, नाणी बदलावी लागतील. नोटबंदीचा एकदा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. सरकारला पुन्हा तो त्रास द्यायचा आहे का ? इंडिया हे नाव बदलल्यानंतर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाव बदलण्यासाठी सहमती घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, ऊस वाहतूकदार संघटनेचे संदीप राजोबा आदी उपस्थित होते.‘स्वाभिमानी’ स्वतंत्रच लढणारकेंद्र आणि राज्य सरकार हे शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. या सरकारला तीव्र विरोध करण्यात विरोधकही अपयशी ठरले आहेत. सत्ता कुणाचीही असली तरी त्यामध्ये साखर कारखानदारांची लॉबी आहेच. हे कारखानदार शेतकऱ्यांचे कधीच हित पाहणार नाहीत. म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबर न जाता राज्यात स्वाभिमानी पक्ष स्वतंत्रच लढणार आहे. मी स्वत: हातकणंगले लोकसभा आणि सांगलीसह अन्य मतदारसंघांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार निश्चित करणार आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

रविकांत तुपकर स्वाभिमानी बरोबरचबुलढाणा जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांनीच संघटनेबरोबर असल्याचा खुलासा केला आहे. तुपकरांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहे. ते संघटनेत लवकरच सक्रीय सहभागी होती, असेही राजू शेट्टी म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार