शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

सांगली महापालिकेत महायुतीचाच झेंडा फडकणार, ६५ जागा जिंकू; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:00 IST

महापालिका इमारतीचे निवडणूकीपूर्वी भूमिपूजन करणार

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीची आम्ही तयारी सुरू केली आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये आल्यामुळे आमची ताकद वाढली आहे. महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असून, महायुतीचे ६० ते ६५ नगरसवेक विजयी होतील. महापालिकेची निवडणूक आम्हीच जिंकू, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सांगली महापालिकेच्या नवीन इमारतीचे निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सांगलीतील स्टेशन चौकातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ६० ते ६५ नगरसवेक विजयी होतील. या शंका नाही. मात्र आम्ही कोणतीही निवडणूक सहज घेत नाही, त्यासाठी परिश्रम घेतो. काही लोक आमच्यात आले आहे, काहींचे येणे निश्चित झाले आहे, तर काहींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमची ताकद वाढतच राहणार आहे, तसेच महापालिकेसाठी सुसज्ज अशी इमारत बांधण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

या इमारतीसाठी निधीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जयश्रीताई पाटील यांनी केली आहे. फडणवीस यांनी इमारतीच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. निधी लवकर मिळेल, अशी अपेक्षा आहे. महापालिका निवडणूकीपूर्वी महापालिका इमारतीचे भूमिपूजन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

प्रत्येक सोमवारी नागरिकांना भेटणारमी स्वत: आता माजी नगरसवेक, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या घरी भेटी देऊन त्यांची विचारपूस करणार आहे. प्रशासकीय इमारतीत पालकमंत्र्यांच्या कार्यालयात मी प्रत्येक सोमवारी ११ नागरिकांना भेटणार आहे. त्यांचे प्रश्न, अडचणी जागेवर सोडविणार आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

जयंतरावांच्या डोक्यात काय, चेहऱ्यावरून कळत नाहीराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षात नाराज आहेत. या प्रश्नाबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जयंतरावांच्या डोक्यात काय आहे, ते त्यांच्या चेहऱ्यावर कळत नाही. त्यामुळे त्यांचा जवळचा कोणी असेल, तर त्याला माझ्या कानात सांगायला सांगा. जयंतरावांचे नेमके काय चालू आहे, सहजासहजी कळत नाही. ते नाही म्हणतात, त्यावेळी नक्कीच काही तर वेगळे करत असतात.