शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Sangli: कालव्यात पडून रात्रभर तडफडत राहिले जीव, तासगावच्या अपघातात तीन कुटुंब उद्ध्वस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 12:38 IST

अपघातात बचावलेल्या स्वप्नाली भोसले यांनी अखंड रात्र जखमी अवस्थेत, जीवघेण्या वेदनांनी आक्रोश करीत घालवली

दत्ता पाटीलतासगाव : चिमुकल्या राजवीच्या वाढदिवसानिमित्त आनंदाचे अनेक सुंदर क्षण कवेत घेऊन तासगावचे राजेंद्र पाटील त्यांच्या दोन्ही मुली व नातवंडांना घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले. मनाच्या पटलावर कार्यक्रमातील आनंदाच्या लाटा उधाणलेल्या असतानाच परतीच्या प्रवासात अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरच मृत्यूच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला अन् तीन कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाली. वाढदिवसाच्या आनंदाच्या कोंदणात काळाने मृत्यूचे गोंदण काेरले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळजाच्या तुकड्यांना पाहून ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.बांधकाम अभियंता असलेले राजेंद्र पाटील यांच्या लहान मुलीच्या मुलीचा मंगळवारी तिसरा वाढदिवस. यानिमित्ताने सर्व परिवाराने एकत्रित येऊन मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला. आनंदाचे क्षण कॅमेऱ्यात चित्रबद्ध केले. कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून पाटील कुटुंबीय तासगावच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले. मोठी मुलगी पुण्याहून उन्हाळ्याच्या सुटीसाठी आठ दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. तिच्यासह तिच्या दोन्ही मुली सोबतच होत्या. वाढदिवस झाल्यानंतर कोकळे येथे असणारी लहान मुलगी आणि वाढदिवस झालेली नात राजवी यांनाही सोबत घेतले आणि उन्हाळ्याच्या सुटीचे आठ दिवस एकत्रित मुली आणि नातवंडांसमवेत साजरे करण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले.तासाभराचा प्रवास करून मध्यरात्री ते तासगावजवळ आले आणि अवघ्या काही मिनिटांचा प्रवास शिल्लक असतानाच वाहनावरील ताबा सुटल्यामुळे कार कालव्यात कोसळली. हा अपघात पहाटेपर्यंत कोणाच्याच लक्षात आला नाही. अखंड रात्र रक्ताच्या थारोळ्यात चुराडा झालेली कार पडून होती. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात लक्षात आल्यानंतर एकच हलकल्लोळ माजला.मृत्यू झालेल्या सहाही जणांचे पार्थिव जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. राजेंद्र पाटील यांचा मुलगा आणि मोठा जावई हेदेखील बारा वाजण्याच्या सुमारास पुण्याहून रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर रुग्णालयात हृदय हेलावून टाकणारा आक्रोश आणि मन सुन्न करणारे चेहरे पाहायला मिळत होते.काही मिनिटांच्या अंतरावर घर आले असतानाच प्रवासात पाटील कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. या घटनेने तीन कुटुंब उद्ध्वस्त झाली. या कुटुंबीयांच्या नातेवाइकांचा आक्रोशदेखील काळीज पिळवटून टाकणारा होता.

..अन् बाळ पोरका झालाअभियंता असलेल्या राजेंद्र पाटील यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. दोन्ही मुलींचेे लग्न झाले, तर मुलगा नुकताच अभियंत्याची पदवी घेऊन पुण्याला करिअरसाठी गेला होता. अपघाताची माहिती मिळताच तो काही तासांत ग्रामीण रुग्णालयात आला. तिथे आई-वडिलांच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर त्याने मोठा हंबरडा फोडला. आई-वडिलांनी मुलाचे ‘बाळ’ असे टोपण नाव ठेवले होते. या अपघाताने बाळ पोरका झाल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली.

रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर आक्रोशरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडी कॅनॉलमध्ये पडल्यानंतर गाडीचा चुराडा झाला. गाडीत असलेल्या पोटच्या मुलीसह, आई-वडील, बहीण आणि बहिणीच्या दोन्ही मुलींचा नजरेसमोर मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात अपघातात बचावलेल्या राजेंद्र पाटील यांची धाकटी कन्या स्वप्नाली भोसले यांनी अखंड रात्र जखमी अवस्थेत, जीवघेण्या वेदनांनी आक्रोश करीत घालवली. मात्र, हा आवाज कोणाच्या कानावर पोहोचला नाही. तब्बल सहा तास मरणासन्न वेदना भोगत गाडीतच तब्बल सहा तास काढले.

पतीच्या डोळ्यातून वेदनांच्या धाराराजेंद्र पाटील यांची मोठी मुलगी प्रियांका खराडे पुणे येथे पतीच्या नोकरीच्या ठिकाणी स्थायिक आहे. आठच दिवसांपूर्वी उन्हाळ्याच्या सुटीसाठी प्रियांका दोन्ही चिमुकल्या मुलींना घेऊन माहेरी आल्या होत्या. मात्र, काळाने घाला घातल्यामुळे दोन्ही मुलींसह प्रियांकाला जीव गमवावा लागला. पुण्याहून आलेल्या पती अवधूत खराडे यांनी रुग्णालयाच्या आवारातच हंबरडा फोडला होता. अवघे कुटुंबच या अपघातात उद्ध्वस्त झाले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू