शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
2
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
3
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
4
OYO कांड! विवाहित प्रेयसीसोबत पकडले, प्रियकराने विवस्त्रावस्थेतच हायवेवरून धूम ठोकली... 
5
लिव्ह इनमधील २४ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू; सैयारा सिनेमा पाहून काय घडले? पोलीस हैराण 
6
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
7
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
8
Stock Market Today: शेअर बाजारात मोठी घसरण, ३०० अंकांपेक्षा जास्त घसरण; Nifty २५००० च्या खाली, NBFC Stocks आपटले
9
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
10
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
11
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
12
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
13
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
14
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
15
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
16
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
17
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
18
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
19
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
20
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब

कराड-कडेगाव-पंढरपूर रेल्वे मार्गाचे स्वप्न भंगले, केंद्र सरकारचे दुटप्पी धोरण आले उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:38 IST

कडेगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी संजीवनी ठरणारा कराड - कडेगाव - पंढरपूर (१५४ किमी) हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प केंद्र ...

कडेगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी संजीवनी ठरणारा कराड - कडेगाव - पंढरपूर (१५४ किमी) हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारने तब्बल सात वर्षांपूर्वीच रद्द केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. २०१४-१५ मध्ये या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही, आर्थिक परतावा दर (-२.२९%) कमी असल्याचे कारण पुढे करत रेल्वे मंत्रालयाने ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकल्पाचा बळी दिला.या निर्णयाची माहिती सात वर्षे जनतेसमोर आली नाही. मात्र, सोनसळ येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. विश्राम कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा सत्याचा बॉम्ब फुटला आणि विकासाचे खोटे गाजर दाखवणाऱ्या धोरणांचा बुरखा फाडला गेला.२३९६.४९ कोटींच्या या रेल्वे प्रकल्पाला केंद्राने नाकारल्याने सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रगतीला यामुळे मोठा धक्का बसला आहे. हा रेल्वे मार्ग झाला असता, तर हजारो नागरिकांना जलद, सुलभ आणि सुरक्षित प्रवासाची संधी मिळाली असती. व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाला चालना मिळून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढला असता. मात्र, केंद्र सरकारने या प्रकल्पाला झुगारल्याने नागरिकांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

लढा अखंडित राहील : ॲड. विश्राम कदमहा प्रकल्प केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर लाखो जनतेच्या आशा-आकांक्षांचा प्रश्न आहे. रेल्वे मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला जाईल. हा प्रकल्प पुनरुज्जीवित झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार सामाजिक कार्यकर्ते ॲड. विश्राम अशोकराव कदम यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रावर अन्याय का?उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथे सतत नव्या रेल्वेगाड्या आणि मार्ग मंजूर होतात, मग महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प का डावलले जातात? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. राजकीय नेत्यांनी आता मौन सोडून हा लढा पुढे न्यायला हवा, अन्यथा जनता त्यांनाही जबाबदार धरल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरPandharpurपंढरपूरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार