शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगलीतील जतमधून शिक्षकाचे कुटुंब बेपत्ता, शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:27 IST

सीसीटीव्ही, लोकेशनवरून पत्ता लागेना

जत : मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेली पत्नी व दोन लहान मुले जत येथून बेपत्ता असल्याची तक्रार शिक्षक सुभाष कचरे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे. पाच दिवसांनंतरही या कुटुंबाचा शोध लागलेला नाही.सुभाष दत्तात्रय कचरे (वय ३५, मूळ रा. पळसुंदे, ता. अकोले, जि. अहमदनगर) हे गेल्या काही वर्षांपासून जत तालुक्यातील एका हायस्कूलवर शिक्षक आहेत. ते पत्नी सोनाली कचरे (वय ३०), मुले अर्णव (वय ६) व शिवम (वय ३) यांच्यासोबत जतमध्ये राहतात. दि. २८ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते हायस्कूलवर शिकवण्यासाठी गेले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांची पत्नी सोनाली हिला फोन करून मुलांना शाळेत सोडलेस का ? असे विचारले. त्यावर मुलांना शाळेत सोडायलाच चालले आहे, असे तिने सांगितले. त्यानंतर तिचा फोन बंद झाला.शाळेतून घरी आल्यानंतर त्यांचे कुटुंब घरी नव्हते. शेजारी चौकशी केली असता, दुपारपासून घर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेच कचरे जत पोलिसांत कुटुंब बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास गेले, मात्र पोलिसांनी अगोदर नातेवाइकांकडे चौकशी करून नंतर तक्रार द्या, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सर्वत्र चौकशी करून अखेर कचरे यांनी पाेलिसात तक्रार दिली.गेल्या पाच दिवसांपासून कचरे यांची दोन लहान मुले व पत्नी बेपत्ता असून पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. शाळेत गेलेली मुले व पत्नी गायब कसे झाले, याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

सर्व नातेवाइकांकडे विचारपूससुभाष कचरे यांनी सर्व नातेवाइकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र, अद्याप या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. त्यांचे बरेचसे नातेवाईक जतमध्ये आले असून, तिघांचाही कसून शोध घेतला जात आहे.

सीसीटीव्ही, लोकेशनवरून पत्ता लागेना

प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी घराजवळचे सीसीटीव्ही तपासले आहेत. परंतु शहरासह बसस्थानक व इतर ठिकाणचेही सीसीटीव्ही तपासावेत, तसेच पत्नीच्या मोबाइल लोकेशनवरून शोधण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस