शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीवर कर आकारणीचा दणका बसणार

By admin | Updated: August 30, 2015 22:36 IST

विजय कुंभार : इस्लामपूर नगराध्यक्षांच्या हलगर्जीपणाचा परिणाम; फेरमूल्यांकनाचे काम सुरू

अशोक पाटील - इस्लामपूर  येणाऱ्या काळात शहरातील मालमत्ता धारकांच्या घरपट्टीमध्ये घनकचरा शुल्काची वाढ होणार आहे. ही वाढ घरपट्टीच्या रकमेवर आधारित असणार आहे. ज्यांना ५00 ते १५000 रुपयांपर्यंत घरपट्टी येते, त्यांच्या घरपट्टीमध्ये वार्षिक ६00 ते ३ हजार ६00 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी आणि सत्ताधारी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.कुंभार म्हणाले, शहरातील मालमत्तेचे फेरमूल्यांकन करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे घरपट्टीमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. हे फेरमूल्यांकन करताना मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करून आपल्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्याच्यावर तिसरी सुनावणी नगरपरिषद घेणार आहे. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टीची वाढ होण्याची शक्यता असतानाच, शासनाने घरोघरी जाऊन घनकचरा संकलन करण्यासाठी व नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीचा अधिकार प्रत्येक नगरपरिषदेला दिला आहे. या आकारणीमध्ये नगरपरिषदेस ५0 रुपयांपासून ३00 रुपयांपर्यंत प्रति महिना आकारणी करण्याचे अधिकार दिले आहेत. नागरिकांच्या हिताचा विचार करुन मालमत्ता धारकांना दिलासा देण्यासाठी नगरपरिषद ५0 रुपयांपर्यंत प्रति महिना सरसकट आकारणी करुन मालमत्ता धारकांना दिलासा देऊ शकत होती. तसा अधिकार शासनाने सभागृहास दिला आहे. परंतु इस्लामपूरचे नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांना तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिलेला प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे न केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यामुळे हा प्रस्ताव आहे तसा मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्लामपूर शहरातील मालमत्ता धारकांना अतिरिक्त करवाढीचा मोठा दणका बसण्याची शक्यता कुंभार यांनी वर्तविली आहे. याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.नागरिकांना न्याय देण्याचे मोठे आव्हानइस्लामपूर पालिकेने मालमत्ता धारकांच्या हिताच्यादृष्टीने कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. नियोजित विकास आराखडा आजही निर्णयाविना प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना गुंठेवारी नियमित करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने, त्यांनी नाईलाजास्तव गुंठा, दोन गुंठ्यावर आपली घरे बांधलेली आहेत. ती आता बेकायदा ठरणार कशी? हाही प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे आहे. त्यातच वाढीव घरपट्टीची टांगती तलवार सर्वच मालमत्ता धारकांवर असणार आहे. या सर्वांना न्याय देण्याचे मोठे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे उभे राहणार आहे.