शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

Sangli- ताकारी योजना: वीजबिल थकबाकीच्या संकटावर मात करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:50 IST

५३८८४ अश्वशक्तीची योजना : प्रतिदिन सुमारे ८ लाखांचे वीजबिल

प्रताप महाडिककडेगाव : ५३ हजार ८८४ अश्वशक्तीच्या ताकारी उपसा सिंचन प्रकल्प योजनेस प्रतिदिन ४१ मेगावॅट वीज लागते. या योजनेचे १ रुपये १६ पैसे प्रतीयुनिट या सवलतीच्या दराने प्रतिदिन सुमारे ८ लाख वीजबिल येते. ताकारी योजनेची आवर्तने वार्षीक सरासरी १४०-१६० दिवसांपर्यंत चालतात. या आवर्तन परिचलनासाठी दरवर्षी सुमारे १३-१४ कोटी रुपये वीजबिल महावितरणला द्यावे लागते. त्या प्रमाणात पाणीपट्टीची रक्कम शेतक-यांकडून जमा होणे आवश्यक असते. परिणामी यामुळे काहीवेळा वीजबिल थकबाकीचा प्रश्न योजनेपुढे उभा राहतो. यावर मात करण्यासाठी ही योजना सौर उर्जेवर चालवणे भविष्यात अतिशय गरजेचे आहे.

या योजनेचे सद्यस्थितीत वीजबिल थकीत नसले तरी यापूर्वी अनेकदा ही योजना वीजबिल थकबाकीच्या संकटात अडकली होती. मात्र राज्य शासनाच्या मदतीने आणि साखर कारखान्यांनी पाणी पट्टी वसुलीस सहकार्य केल्यामुळे वेळोवेळी या संकटातून ताकारी योजना बाहेर पडली. डॉ. पतंगराव कदम मदत व पुनर्वसन मंत्री असताना दुष्काळी स्थितीत उन्हाळी आवर्तनाची वीज बिले राज्य शासनाने टंचाई उपाययोजना निधीतून भरून योजनेवरील वीज बिल थकबाकीचा बोजा कमी केला. यामुळे मार्ग निघत गेले.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात २०११ मध्ये वीजबिल सवलत योजना सुरू झाली तेंव्हापासून वेळोवेळी ही मुदतवाढ मिळत आहे.अन्यथा वाढीव दराने सद्यस्थितीत येणाऱ्या विजबिलाच्या पाचपट वीजबिल येईल आणि ८१-१९ फॉर्म्युला असूनही ही योजना केवळ वीजबिल थकबाकीमुळे बंद पडेल.

विजबिलाच्या ८१ /१९ फॉर्म्युल्यामुळे दिलासा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य शासनाने ८१ टक्के व शेतकऱ्यांकडून १९ टक्के वीजबिल रक्कम भरण्याचा निर्णय झाला. याबाबतचा अध्यादेश जानेवारी २०१८ ला काढण्यात आला.

वीजबिल सवलत योजनेस हवी मुदतवाढ २०२३ मध्ये सिंचन योजनांची वीजबिल सवलत रद्द करणेत आल्यामुळे वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. सवलतीच्या १ रुपये १६ पैसे दराने मिळणार विज ५:२६ पैसे दराने झाली होती.मात्र जनरेट्यामुळे व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे वीजबिलाच्या सवलतीस राज्य सरकारने ३१मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली.आता ३१ मार्च नंतर पुन्हा मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा आहे.

विश्वजित कदम, सुहास बाबर व रोहित पाटील यांच्यावर भिस्त कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ या योजनांचा समावेश आहे.यातील म्हैसाळ योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. ताकारी योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव महाजनकोकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळविण्यासाठी आमदार विश्वजित कदम,आमदार सुहास बाबर आणि आमदार रोहित पाटील यांनी पाठपुरावा करावा अशी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीelectricityवीजFarmerशेतकरी