शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

साखर कारखान्यांनी सीएनजी, हायड्रोजन निर्मितीकडे वळावे; शरद पवारांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 15:46 IST

साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा

कुंडल : दुष्काळी भाग असला तरी स्वाभिमानाने जगण्याची उर्मी येथील माणसांमध्ये आहे. त्यामुळे पाणी नसले तरी व्यवसायांच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन हे लोक सन्मानाने जगत आहेत. सांगलीच्या कारखानदारीचा देशात लौकिक आहे. येथील साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा. डिस्टिलरी, इथेनॉलनंतर आता सीएनजी, हायड्रोजन गॅस निर्मितीकडे वळण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.कुंडल (ता. पलूस) येथे शुक्रवारी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण, जन्मशताब्दी सांगता समारंभ, ‘क्रांतीदर्शी’ या जन्मशताब्दी स्मृती अंकाचे प्रकाशन, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना विस्तारीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.पवार म्हणाले, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्यासह नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर सामान्यांना अभिप्रेत आर्थिक विकास केला. या परिसरातील माणसाला येथेच स्वाभिमानाने जगण्यासाठी पाणी योजना सुरू केल्या. साखर कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालविली. क्रांतिअग्रणी कारखान्याला दरवर्षी पुरस्कार मिळतो, हे अरुण लाड यांच्या काटेकोर नियोजनामुळेच होते.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, जी. डी. बापूंनी सत्तेची पर्वा व सत्तेसाठी राजकारण केले नाही. त्यांचा वारसा अरुण लाड व शरद लाड जपत आहेत. सध्या देशात सत्तेसाठी समाजामध्ये दुही माजविली जात आहे.आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, बापू व पतंगराव कदम यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. भविष्यातही दोन्ही कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते कायम राहील.आमदार अरुण लाड म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा बसविल्याशिवाय बापूंच्या स्मारकाचे लोकार्पण करणार नाही, अशी भूमिका होती. त्यामुळे क्रांतिसिंहांच्या पुतळ्याला शासनाचा निधी उपलब्ध झाला.यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, आमदार बबनराव शिंदे, सुमनताई पाटील, विक्रमसिंह सावंत, शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, किरण लाड, उदय लाड, दिलीप लाड, प्रतीक पाटील, रोहित पाटील, धनश्री लाड, अविनाश पाटील उपस्थित होते.जयंतरावांचा दोन काकांना टोलाराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणात भाजपला टोले लगावताना खासदार पाटील यांना ‘संजयकाका, कानात बोटे घाला,’ असे सांगितले आणि एकच हशा पिकला. वैभव नायकवडी यांना उद्देशून ते म्हणाले, ‘अहो वैभवकाका, नागनाथ अण्णांनी जातीयवादींना कधीही आश्रय दिला नाही,’ यावेळीही खसखस पिकली. 

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSharad Pawarशरद पवार