शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कृष्णा नदीतून आजपासून उपसाबंदी; कोयना, वारणा धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:25 IST

पाण्याचा काटकसरीने वापर करा

सांगली : कोयना धरणात सध्या केवळ १० टक्केच पाणीसाठा आहे. मान्सूनची चाहूल नसल्यामुळे गुरुवारपासून कोयना धरणातील विसर्ग शंभर टक्के बंद केला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने दि. २३ ते २६ जून असे चार दिवस कृष्णा नदीतील शेतीच्या पाणी उपशावर बंदी घातली आहे.कोयना धरणात सध्या एकूण १०.८२ टीएमसी म्हणजे १० टक्के पाणीसाठा आहे. पाणी वापरासाठी उपयुक्त पाणीसाठा ५.७० टीएमसी असून तो केवळ सहा टक्केच आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो गुरुवारपासून बंद केला आहे. वारणा धरणात १०.७० टीएमसी म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३.८२ टीएमसी म्हणजे १४ टक्के साठा आहे.कोयना धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे जलसंपदा विभागाने उपसाबंदी आदेश लागू केला आहे. त्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २३ ते दि. २६ जूनपर्यंत उपसाबंदी, तर दि. २७ ते दि. ३० जून हा उपसा कालावधी आहे. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. उपसाबंदीमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल.उपसा संच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी केले आहे.

काटकसरीने वापर कराकोयना, वारणा धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकरी, औद्योगिक वापरकर्त्यांनी, महापालिका, नगरपालिका प्रशासनाने आणि नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देवकर यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणriverनदीWaterपाणी