शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कृष्णा नदीतून आजपासून उपसाबंदी; कोयना, वारणा धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:25 IST

पाण्याचा काटकसरीने वापर करा

सांगली : कोयना धरणात सध्या केवळ १० टक्केच पाणीसाठा आहे. मान्सूनची चाहूल नसल्यामुळे गुरुवारपासून कोयना धरणातील विसर्ग शंभर टक्के बंद केला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने दि. २३ ते २६ जून असे चार दिवस कृष्णा नदीतील शेतीच्या पाणी उपशावर बंदी घातली आहे.कोयना धरणात सध्या एकूण १०.८२ टीएमसी म्हणजे १० टक्के पाणीसाठा आहे. पाणी वापरासाठी उपयुक्त पाणीसाठा ५.७० टीएमसी असून तो केवळ सहा टक्केच आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो गुरुवारपासून बंद केला आहे. वारणा धरणात १०.७० टीएमसी म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३.८२ टीएमसी म्हणजे १४ टक्के साठा आहे.कोयना धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे जलसंपदा विभागाने उपसाबंदी आदेश लागू केला आहे. त्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २३ ते दि. २६ जूनपर्यंत उपसाबंदी, तर दि. २७ ते दि. ३० जून हा उपसा कालावधी आहे. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. उपसाबंदीमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल.उपसा संच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी केले आहे.

काटकसरीने वापर कराकोयना, वारणा धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकरी, औद्योगिक वापरकर्त्यांनी, महापालिका, नगरपालिका प्रशासनाने आणि नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देवकर यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणriverनदीWaterपाणी