शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

सांगलीबाहेर विद्यापीठाचे उपकेंद्र म्हणजे शासनाचा द्राविडी प्राणायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

संतोष भिसे/लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकारणाचा विषय नसून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण करणारे केंद्र आहे, ...

संतोष भिसे/लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकारणाचा विषय नसून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक जडणघडण करणारे केंद्र आहे, याचा विसर नेत्यांना पडला आहे. उपकेंद्र तासगावमध्ये की खानापूरमध्ये यावरून त्यांच्यात जुंपली आहे. पण ही दोन्ही ठिकाणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गैरसोयीची असल्याकडे डोळेझाक केली जात आहे. सर्वांच्या सोयीसाठी उपकेंद्र सांगलीतच होणे आवश्यक आहे, याचा विसर पडला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बस्तवडे (ता. तासगाव) येथे उपकेंद्राला प्राथमिक मंजुरी देताना विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार केलेला नाही. या मंजुरीमागे फक्त राजकीय हेतू दिसत आहे. कोणाला तरी खूश करणे किंवा कोणाच्या तरी उपकारातून उतराई होणे, या हेतूने झालेला उपकेंद्राचा निर्णय जिल्ह्याच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीचा संघर्ष सांगली शहरातूनच सुरु झाला होता. त्याचे फळ तासगाव किंवा खानापूर तालुक्यात नेऊन टाकल्याने विद्यार्थ्यांची कुतरओढ होणार आहे. विद्यापीठांचे विकेंद्रीकरण व्हावे, अशी शिफारस राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केली, याचा सोयीस्कर अर्थ घेत उपकेंद्र जिल्ह्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात नेऊन टाकले जात आहे. याला सर्व स्तरातून तीव्र विरोध होत आहे. २०१३पासून विद्यापीठाच्या समितीने जिल्हाभरात ३२ गावांची पाहणी केली. रेणावी, बस्तवडे, खानापूर, तासगाव, सांगली, आदी गावे विचारात घेतली. यावर अंतिम निर्णय घेताना मात्र सारासार विचार केला नाही.

चौकट

शिक्षणात पुण्यानंतर सांगलीचा दबदबा

अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणासाठी पुण्यानंतर सांगलीकडे पाहिले जाते. विलिंग्डन, वालचंद, चिंतामणराव, कस्तुरबाई वालचंद, मथुबाई गरवारेसारख्या गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांमधून हजारो नामवंत विद्यार्थी बाहेर पडले आहेत. अनेक दिग्गजांनी येथे विद्यार्थी घडवले आहेत. अजूनही शिक्षणक्षेत्रात या महाविद्यालयांचा दबदबा कायम आहे. अनेक नवनव्या शिक्षण शाखाही सांगलीतच सुरू होत आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणक्रमांच्या देशभरातील ॲकॅडमींनी सांगली शहराला पसंती दिली आहे. खुद्द खानापूर, तासगावचेही विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी सांगलीतच येऊन राहतात. अशा स्थितीत विद्यापीठाच्या कामासाठी विद्यार्थ्यांनी तासगाव-खानापूरला जाणे म्हणजे द्राविडी प्राणायाम ठरेल.

चौकट

नियमांना बगल दिली

विद्यापीठाच्या नियमानुसार जिल्हा मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या परिघात उपकेंद्र असायला हवे. मंत्री सामंत यांनी याचा विचार न करताच उपकेंद्राची जागा जाहीर केली आहे. विद्यापीठ म्हणजे जिल्ह्याचे शैक्षणिक प्रवेशद्वार असते. आता सांगली, मिरजपासून ४५ किलोमीटरवरील बस्तवडेला जाणे म्हणजे यातायात ठरणार आहे.