शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

‘डिप्लोमा’साठी मिळेनात विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:23 PM

दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू   झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने,

ठळक मुद्देअभ्यासक्रमावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे

सांगली : दहावीच्या निकालानंतर अकरावीसह इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू   झाली असली तरी, यंदा विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटल्याने, त्याचा सर्वच प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. त्यातच दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांसह पालकांचाही आयटीआयकडे ओढा वाढल्याने अभियांत्रिकीच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळविताना अनेक महाविद्यालयांची कसरत होणार आहे.

गेल्या काही वर्षांपर्यंत दहावीनंतर अभियांत्रिकीमधील पदविका अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले जात होते. पदविकेनंतर पदवीला थेट दुसºया वर्षात मिळणारा प्रवेश आणि अनुभवामुळे पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थी मिळत होते. आता मात्र, परिस्थिती बदलली असून पदविका अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचा पदवीकडे ओढा असल्याने अनेकजण बारावीनंतरच प्रवेश घेण्यास प्राधान्य देत आहेत. 

यंदा जिल्ह्यातील ११ हजारावर अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. एकीकडे अकरावीच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार असल्याने पदविकेसाठी विद्यार्थी मिळण्यास अडचणी येण्याची चिन्हे आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, पदविका अभ्यासक्रमावर चांगल्या पगाराची नोकरी लागू शकते. तरीही पालकांची मानसिकता बदलत आहे. मुलाने बारावीनंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे यासाठीची मानसिकता पालकांकडून वाढत आहे. त्यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी असतानाही विद्यार्थी कमी असल्याने जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची वानवा आहे.

पदविका केल्यानंतर पदवीला प्रवेश घेणे हा एकमेवच पर्याय आहे. अभ्यासक्रम कालबाह्य बनत चालल्याने पदवी अभ्यासक्रमावेळी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी पदविकेतून पदवीला कोटा २० टक्क्यांचा होता, तो १० टक्क्यांवर आला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSangliसांगलीEducationशिक्षण