शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

शेटफळेत तरुणांचा दुष्काळ मुक्तीसाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:16 IST

लक्ष्मण सरगर । लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळेतील तरुणवर्ग खांद्यावर कुदळ आणि फावडे घेत दुष्काळ मुक्तीसाठी ...

लक्ष्मण सरगर ।लोकमत न्यूज नेटवर्ककरगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळेतील तरुणवर्ग खांद्यावर कुदळ आणि फावडे घेत दुष्काळ मुक्तीसाठी सज्ज झाला आहे. पानी फौंडेशनच्या माध्यमातून गावाला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शेकडो तरुण सरसावले आहेत.राज्यकर्त्यांनी दुष्काळाकडे पाठ फिरवून निवडणुकीचा बाजार भरविला असताना, शेटफळेतील युवकांनी मात्र निवडणुकीच्या रणांगणाऐवजी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावात श्रमदानातून पाण्याचे रणांगण पेटविले आहे. शेटफळे गावातील शेकडो तरुण एकत्र येऊन कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी राबत आहेत. पानी फौंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत शेटफळे गावाने सहभाग नोंदविला आहे. गावामध्ये पडलेले पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरविण्यासाठी युवा वर्ग कष्ट घेत आहे. पानी फौंडेशनच्या कार्यक्रमाअंतर्गत गावातील नागरिकांच्यात प्रथम मनसंधारण करून नागरिकांना जलसंधारणाकडे नेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम युवा वर्ग राबवित आहे. गावातील प्रत्येक चौक व वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाणीदार झालेल्या गावांच्या चित्रफिती दाखविल्या जात आहेत. अनेक युवक, ज्येष्ठ मंडळी व गावकरी ग्रामस्वच्छतेतून एकत्र येत आहेत.स्मशानभूमीत वृक्षारोपणग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून गावातील तरुणांनी एकत्र येत स्मशानभूमीची स्वच्छता करून वृक्षारोपण करत सामाजिक संदेश दिला आहे. दुष्काळी परिस्थितीला निसर्गाबरोबरच शासनकर्तेही जबाबदार आहेत. मात्र शासनकर्त्यांवर विसंबून न राहता दुष्काळ मिटविण्यासाठी युवकांनी घेतलेल्या पुढाकाराने दुष्काळाची दाहकता कमी होण्यास मदत होईल, हे निश्चित. सध्याच्या राजकीय धुळवडीत देशातील युवा वर्ग धुंद असला तरी, शेटफळेतील युवा वर्ग दुष्काळाच्या वणव्यातून बाहेर पडण्यासाठी झगडतो आहे.